शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

अंतरात्म्याला स्मरून मतदान करा

By admin | Updated: July 1, 2017 02:49 IST

देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणारी निवडणूक म्हणजे केवळ संख्याबळाची लढाई नाही. ज्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी आम्ही संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणारी निवडणूक म्हणजे केवळ संख्याबळाची लढाई नाही. ज्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी आम्ही संघर्ष केला त्या उदारमतवादी विचारधारेचे प्रतिबिंब या निवडणुकीत उमटणार आहे. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या अंतरात्म्याला स्मरून मतदान करावे, असे आवाहन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार व लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी शुक्रवारी केले. आमची विचारधारा, भूमिका सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळाला वरचढ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मीरा कुमार शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील १७ विरोधी पक्षांनी एकत्रितपणे माझी उमेदवार म्हणून निवड केली आहे. विरोधकांची ही ऐतिहासिक एकजूट तत्त्वांवर आधारलेली आहे. भारतासारख्या बहुभाषिक, बहुधार्मिक, विविधतेने नटलेल्या देशाला पुढे नेण्यासाठी उदारमतवादी भूमिका आवश्यक आहे. एकीकडे ही विचारधारा तर दुसरीकडे संकुचित आणि आवाज दाबणारी विचारधारा असा हा संघर्ष आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या विवेकबुद्धीला आणि अंतरात्म्याला स्मरून मतदान करावे, असे आवाहन मीरा कुमार यांनी केले. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, नारायण राणे, संजय निरुपम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सपाचे अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, रिपाइंचे राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते. गोहत्येच्या नावाखाली होणाऱ्या हत्या चिंतेची बाब आहे. सरकारकडे ‘प्रचंड’ जनादेश आहे. त्यांनी ताबडतोब ही झुंडशाही थांबवावी, असे आवाहनही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केले.