शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

अंतरात्म्याला स्मरून मतदान करा

By admin | Updated: July 1, 2017 02:49 IST

देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणारी निवडणूक म्हणजे केवळ संख्याबळाची लढाई नाही. ज्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी आम्ही संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणारी निवडणूक म्हणजे केवळ संख्याबळाची लढाई नाही. ज्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी आम्ही संघर्ष केला त्या उदारमतवादी विचारधारेचे प्रतिबिंब या निवडणुकीत उमटणार आहे. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या अंतरात्म्याला स्मरून मतदान करावे, असे आवाहन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार व लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी शुक्रवारी केले. आमची विचारधारा, भूमिका सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळाला वरचढ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मीरा कुमार शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील १७ विरोधी पक्षांनी एकत्रितपणे माझी उमेदवार म्हणून निवड केली आहे. विरोधकांची ही ऐतिहासिक एकजूट तत्त्वांवर आधारलेली आहे. भारतासारख्या बहुभाषिक, बहुधार्मिक, विविधतेने नटलेल्या देशाला पुढे नेण्यासाठी उदारमतवादी भूमिका आवश्यक आहे. एकीकडे ही विचारधारा तर दुसरीकडे संकुचित आणि आवाज दाबणारी विचारधारा असा हा संघर्ष आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या विवेकबुद्धीला आणि अंतरात्म्याला स्मरून मतदान करावे, असे आवाहन मीरा कुमार यांनी केले. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, नारायण राणे, संजय निरुपम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सपाचे अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, रिपाइंचे राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते. गोहत्येच्या नावाखाली होणाऱ्या हत्या चिंतेची बाब आहे. सरकारकडे ‘प्रचंड’ जनादेश आहे. त्यांनी ताबडतोब ही झुंडशाही थांबवावी, असे आवाहनही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केले.