शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अंतरात्म्याला स्मरून मतदान करा

By admin | Updated: July 1, 2017 02:49 IST

देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणारी निवडणूक म्हणजे केवळ संख्याबळाची लढाई नाही. ज्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी आम्ही संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या सर्वोच्च पदासाठी होणारी निवडणूक म्हणजे केवळ संख्याबळाची लढाई नाही. ज्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी आम्ही संघर्ष केला त्या उदारमतवादी विचारधारेचे प्रतिबिंब या निवडणुकीत उमटणार आहे. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या अंतरात्म्याला स्मरून मतदान करावे, असे आवाहन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार व लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी शुक्रवारी केले. आमची विचारधारा, भूमिका सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळाला वरचढ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मीरा कुमार शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील १७ विरोधी पक्षांनी एकत्रितपणे माझी उमेदवार म्हणून निवड केली आहे. विरोधकांची ही ऐतिहासिक एकजूट तत्त्वांवर आधारलेली आहे. भारतासारख्या बहुभाषिक, बहुधार्मिक, विविधतेने नटलेल्या देशाला पुढे नेण्यासाठी उदारमतवादी भूमिका आवश्यक आहे. एकीकडे ही विचारधारा तर दुसरीकडे संकुचित आणि आवाज दाबणारी विचारधारा असा हा संघर्ष आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या विवेकबुद्धीला आणि अंतरात्म्याला स्मरून मतदान करावे, असे आवाहन मीरा कुमार यांनी केले. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, नारायण राणे, संजय निरुपम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सपाचे अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, रिपाइंचे राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते. गोहत्येच्या नावाखाली होणाऱ्या हत्या चिंतेची बाब आहे. सरकारकडे ‘प्रचंड’ जनादेश आहे. त्यांनी ताबडतोब ही झुंडशाही थांबवावी, असे आवाहनही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केले.