शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण, दगडफेकीत पोलीस जखमी

By admin | Updated: April 17, 2017 12:25 IST

श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी सोमवारी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी सोमवारी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत या मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. ज्यात एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. 
 
विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला अश्रूधूर सोडावा लागला. श्रीनगरमधील पुलवामा येथील ही घटना आहे. या घटनेनंतर जवानांच्या लाठीचार्जविरोधात काश्मीर खोऱ्यातील सर्व महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.
 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून श्रीनगरमध्ये कोणत्या-न्-कोणत्या गोष्टीवरुन हिंसाचार सुरूच आहे. 
 
श्रीनगरमध्ये सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू
दरम्यान, श्रीनगरमध्ये (15 एप्रिल) शनिवारी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला. तर, दुस-या घटनेत सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत पुलवामा येथे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात सज्जाद अहमद या तरूणाचा मृत्यू झाला आहे. 
 
उत्तर काश्मीरच्या बटमालू परिसरात सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये सज्जादचा मृत्यू झाला असं स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी हे वृत्त खोडून काढत परिसरात सुरक्षा रक्षकांची तैनाती करण्यात आळी नव्हती आम्ही प्रकरणाची चौकशी करत आहोत असं म्हटलं आहे. 
 
तर, पुलवामा येथे एका स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  महाविद्यालयाबाहेर पोलीस चौकी बांधण्याचा विरोध करताना सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्यात आली. प्रत्युत्तरात जवानांनी अश्रु धूराच्या नळ्या सोडल्या त्यामुळे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.