शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील आंदोलनास हिंसक वळण, ४ ठार

By admin | Updated: August 26, 2015 18:27 IST

गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाने बुधवारी हिंसक वळण घेतले.

ऑनलाइन लोकमत.
अहमदाबाद, दि. २६ -  ओबीसी कोट्यात आरक्षण द्या, अन्यथा २०१७ च्या निवडणुकीत गुजरातेत कमळ फुलणार नाही, असे जाहीर आव्हान देत आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गुजरातमधील पटेल समुदायाच्या  अहमदाबादेतील भव्य रॅली विविध कारणांनी गाजली. रॅलीला हिंसेचे गालबोट लागले, निकोल परिसरात सरकारी सेवा केंद्राची जाळपोळ, सात लाख रुपयांची रोख रक्कम जळाली आणि सर्व कादपत्रे जळाली तर अहमदाबादच्या चांदलोडिया परिसरात आंदोलकर्त्यांनी रेल्वे ट्रॅक तोडून ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार अंदोलनकर्ते ठार झाले आहे. रॅलीदरम्यान प्रत्यक्ष रॅलीस्थळी आणि शहरात अनेक ठिकाणी संघर्ष उडाला. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमारासह अश्रुधुराचे नळकांडे फोडावे लागले. यादरम्यान आंदोलनकर्ते माजी आमदार शंकरराव गडाख आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असल्याचे वृत आहे.
अहमदाबादमध्ये १३ वर्षांनंतर नऊ भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सूरत व अहमदाबादमधील शाळा- कॉलेजेस आज बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान गुजरातमधील या आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला असून अनेक ट्रेन्सचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी आरक्षण दिले जावे. जर भाजप सरकारला ही मागणी पूर्ण करता आली नाही, तर 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील. आरक्षण नाही तर गुजरातमध्ये कमळदेखील नाही, असा इशाराच पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी येथे "महाक्रांती‘ रॅलीमध्ये बोलताना दिला होता. 
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये कमळही उमलणार नाही असा इशारा हार्दिक पटेल यांनी दिला होता.
 
मोदींनी गुजरातच्या जनतेला केले शांतता राखण्याचे आवाहन 
हिंसेतून कोणाचंही भल होत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पटेल समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे कालपासून गुजरात धुमसत आहे. संतप्त जमावाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यात जाळपोळ व दगडफेक केली असून अहमदाबादमधील नऊ भागातं संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजराती भाषेतून संदेश दिला. ' जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करतानाच चर्चेद्वारे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात' असे मोदी म्हणाले. गुजरातमधील सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. ' हिंसेतून कधीही कोणाचा लाभ होऊ शकत नाही. मात्र जर सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर त्यात सर्वांचेच हित आहे. मी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. गुजरात विकासाची नवी उंची गाठत असून राज्यातील संपूर्ण जनतेने त्यात सहभागी व्हायला हवे. लोकशाहीच्या मर्यादेचे सर्वांनी पालन केले पाहिजे,' असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.