शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

गुजरातमधील आंदोलनास हिंसक वळण, ४ ठार

By admin | Updated: August 26, 2015 18:27 IST

गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाने बुधवारी हिंसक वळण घेतले.

ऑनलाइन लोकमत.
अहमदाबाद, दि. २६ -  ओबीसी कोट्यात आरक्षण द्या, अन्यथा २०१७ च्या निवडणुकीत गुजरातेत कमळ फुलणार नाही, असे जाहीर आव्हान देत आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गुजरातमधील पटेल समुदायाच्या  अहमदाबादेतील भव्य रॅली विविध कारणांनी गाजली. रॅलीला हिंसेचे गालबोट लागले, निकोल परिसरात सरकारी सेवा केंद्राची जाळपोळ, सात लाख रुपयांची रोख रक्कम जळाली आणि सर्व कादपत्रे जळाली तर अहमदाबादच्या चांदलोडिया परिसरात आंदोलकर्त्यांनी रेल्वे ट्रॅक तोडून ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार अंदोलनकर्ते ठार झाले आहे. रॅलीदरम्यान प्रत्यक्ष रॅलीस्थळी आणि शहरात अनेक ठिकाणी संघर्ष उडाला. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमारासह अश्रुधुराचे नळकांडे फोडावे लागले. यादरम्यान आंदोलनकर्ते माजी आमदार शंकरराव गडाख आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असल्याचे वृत आहे.
अहमदाबादमध्ये १३ वर्षांनंतर नऊ भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सूरत व अहमदाबादमधील शाळा- कॉलेजेस आज बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान गुजरातमधील या आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला असून अनेक ट्रेन्सचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी आरक्षण दिले जावे. जर भाजप सरकारला ही मागणी पूर्ण करता आली नाही, तर 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील. आरक्षण नाही तर गुजरातमध्ये कमळदेखील नाही, असा इशाराच पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी येथे "महाक्रांती‘ रॅलीमध्ये बोलताना दिला होता. 
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये कमळही उमलणार नाही असा इशारा हार्दिक पटेल यांनी दिला होता.
 
मोदींनी गुजरातच्या जनतेला केले शांतता राखण्याचे आवाहन 
हिंसेतून कोणाचंही भल होत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पटेल समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे कालपासून गुजरात धुमसत आहे. संतप्त जमावाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यात जाळपोळ व दगडफेक केली असून अहमदाबादमधील नऊ भागातं संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजराती भाषेतून संदेश दिला. ' जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करतानाच चर्चेद्वारे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात' असे मोदी म्हणाले. गुजरातमधील सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. ' हिंसेतून कधीही कोणाचा लाभ होऊ शकत नाही. मात्र जर सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर त्यात सर्वांचेच हित आहे. मी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. गुजरात विकासाची नवी उंची गाठत असून राज्यातील संपूर्ण जनतेने त्यात सहभागी व्हायला हवे. लोकशाहीच्या मर्यादेचे सर्वांनी पालन केले पाहिजे,' असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.