शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काश्मीरमध्ये हिंसक उद्रेक, जमावाने केली पोलिसाची हत्या

By admin | Updated: July 10, 2016 17:45 IST

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला चकमकीत जवानांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खो-यात उफाळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही.

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. १० - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला चकमकीत जवानांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खो-यात उफाळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. रविवारी हिंसाचाराच्या घटनांमध्ये तीन जण ठार झाले. यात एका पोलिसाचा समावेश आहे. काश्मीर खो-यातीला मृतांचा आकडा आता १८ झाला असून, २०० जण हिंसक आंदोलनात जखमी झाले आहेत. 
 
काश्मीरमध्ये अनेक भागात संचारबंदी असून, मोबाईलमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून, यात्रेकरुंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. 
 
रविवारी सकाळी पुलावामाच्या नेवा भागात सुरक्षा जवान आणि आंदोलकांच्या चकमकीत इरफान अहमद मलिक हा १८ वर्षांचा युवक मरण पावला. अनंतनाग जिल्ह्यात संगममध्ये जमावाने पोलिसांची बंकर व्हॅन झेलनदीमध्ये ढकलून दिली. यात वाहनचालक फिरोझ अहमद ठार झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 
दुस-या एका घटनेत शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी पुलवामा तराल भागात रहाणा-या हेड कॉन्स्टेबलच्या घरात घुसून दोन्ही पायांमध्ये गोळया घातल्या. शनिवारी रात्री जमावाने दामहाल हांजीपोरा भागात पोलिस स्थानकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तीन पोलिस बेपत्ता असून अजून त्यांचा शोध लागलेला नाही अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री नईम अख्तर यांनी दिली.