शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रसिद्धीच्या मोहामुळे हिंसाचार

By admin | Updated: August 2, 2016 05:16 IST

काश्मीर प्रश्न हा खूप नाजूक आहे, त्याबाबतचे निर्णय घेताना खूप सावधानता बाळगली पाहिजे.

पुणे : काश्मीर प्रश्न हा खूप नाजूक आहे, त्याबाबतचे निर्णय घेताना खूप सावधानता बाळगली पाहिजे. मात्र, भाजप सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढत आहे,असा घणाघाती आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी केला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. स्वैराचाराचे राज्य निर्माण होते त्यावेळी ते कोसळायला वेळ लागत नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘‘दहशतवादी अजमल कसाब, अफजल गुरू यांना फाशी दिली जाईपर्यंत त्याची माहिती कुठेही दिली नाही. त्यानंतरही काश्मीरमध्ये योग्य त्या सुरक्षितेच्या उपाययोजना केल्या. मात्र, बुऱ्हाण वाणीच्या प्रकरणात तसे झाले नाही. काश्मीर प्रश्न चर्चेने सोडविला पाहिजे. तिथल्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. भाजप सरकारच्या काळात सीमेवर घुसखोरी वाढली आहे. दलितांवरील हल्ले वाढले आहेत. सरकार कडक कारवाई करत नाही, त्यामुळे अशा घटना वाढल्या. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये गोरक्षकांना आवर घालण्याची गरज आहे.’’ पंतप्रधान देशाची सुरक्षा, दलित अत्याचार यावर काहीच बोलत नाहीत. यातून जगभर चुकीचा संदेश जात आहे. इसिसचा धोका वाढत असून त्यासाठी विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मी गृहमंत्री असताना माझ्यापर्यंत आला नव्हता, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. भाजप-शिवसेना दोघांना सत्ता हवी आहे, त्यामुळे ही युती तुटण्याची कोणतीही शक्यता नाही. अ‍ॅट्रासिटी कायदा गरजेचाच असून त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>महाराष्ट्र अखंड रहावामहाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे. अखंड महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मांनी बलिदान दिले आहे याची आठवण ठेवली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, कोकण यातील प्रादेशिक असमतोल दूर होण्यासाठी लक्ष दिले पाहिजे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.