शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धीच्या मोहामुळे हिंसाचार

By admin | Updated: August 2, 2016 05:16 IST

काश्मीर प्रश्न हा खूप नाजूक आहे, त्याबाबतचे निर्णय घेताना खूप सावधानता बाळगली पाहिजे.

पुणे : काश्मीर प्रश्न हा खूप नाजूक आहे, त्याबाबतचे निर्णय घेताना खूप सावधानता बाळगली पाहिजे. मात्र, भाजप सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढत आहे,असा घणाघाती आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी केला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. स्वैराचाराचे राज्य निर्माण होते त्यावेळी ते कोसळायला वेळ लागत नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘‘दहशतवादी अजमल कसाब, अफजल गुरू यांना फाशी दिली जाईपर्यंत त्याची माहिती कुठेही दिली नाही. त्यानंतरही काश्मीरमध्ये योग्य त्या सुरक्षितेच्या उपाययोजना केल्या. मात्र, बुऱ्हाण वाणीच्या प्रकरणात तसे झाले नाही. काश्मीर प्रश्न चर्चेने सोडविला पाहिजे. तिथल्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. भाजप सरकारच्या काळात सीमेवर घुसखोरी वाढली आहे. दलितांवरील हल्ले वाढले आहेत. सरकार कडक कारवाई करत नाही, त्यामुळे अशा घटना वाढल्या. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये गोरक्षकांना आवर घालण्याची गरज आहे.’’ पंतप्रधान देशाची सुरक्षा, दलित अत्याचार यावर काहीच बोलत नाहीत. यातून जगभर चुकीचा संदेश जात आहे. इसिसचा धोका वाढत असून त्यासाठी विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मी गृहमंत्री असताना माझ्यापर्यंत आला नव्हता, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. भाजप-शिवसेना दोघांना सत्ता हवी आहे, त्यामुळे ही युती तुटण्याची कोणतीही शक्यता नाही. अ‍ॅट्रासिटी कायदा गरजेचाच असून त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>महाराष्ट्र अखंड रहावामहाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे. अखंड महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मांनी बलिदान दिले आहे याची आठवण ठेवली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, कोकण यातील प्रादेशिक असमतोल दूर होण्यासाठी लक्ष दिले पाहिजे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.