शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

प्रसिद्धीच्या मोहामुळे हिंसाचार

By admin | Updated: August 2, 2016 05:16 IST

काश्मीर प्रश्न हा खूप नाजूक आहे, त्याबाबतचे निर्णय घेताना खूप सावधानता बाळगली पाहिजे.

पुणे : काश्मीर प्रश्न हा खूप नाजूक आहे, त्याबाबतचे निर्णय घेताना खूप सावधानता बाळगली पाहिजे. मात्र, भाजप सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढत आहे,असा घणाघाती आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी केला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. स्वैराचाराचे राज्य निर्माण होते त्यावेळी ते कोसळायला वेळ लागत नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘‘दहशतवादी अजमल कसाब, अफजल गुरू यांना फाशी दिली जाईपर्यंत त्याची माहिती कुठेही दिली नाही. त्यानंतरही काश्मीरमध्ये योग्य त्या सुरक्षितेच्या उपाययोजना केल्या. मात्र, बुऱ्हाण वाणीच्या प्रकरणात तसे झाले नाही. काश्मीर प्रश्न चर्चेने सोडविला पाहिजे. तिथल्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. भाजप सरकारच्या काळात सीमेवर घुसखोरी वाढली आहे. दलितांवरील हल्ले वाढले आहेत. सरकार कडक कारवाई करत नाही, त्यामुळे अशा घटना वाढल्या. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये गोरक्षकांना आवर घालण्याची गरज आहे.’’ पंतप्रधान देशाची सुरक्षा, दलित अत्याचार यावर काहीच बोलत नाहीत. यातून जगभर चुकीचा संदेश जात आहे. इसिसचा धोका वाढत असून त्यासाठी विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मी गृहमंत्री असताना माझ्यापर्यंत आला नव्हता, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. भाजप-शिवसेना दोघांना सत्ता हवी आहे, त्यामुळे ही युती तुटण्याची कोणतीही शक्यता नाही. अ‍ॅट्रासिटी कायदा गरजेचाच असून त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>महाराष्ट्र अखंड रहावामहाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे. अखंड महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मांनी बलिदान दिले आहे याची आठवण ठेवली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, कोकण यातील प्रादेशिक असमतोल दूर होण्यासाठी लक्ष दिले पाहिजे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.