शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी अटकेचा डाव हे घटनेचे उल्लंघन

By admin | Updated: July 5, 2015 23:18 IST

शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करेपर्यंत कोठडीत ठेवणे हे घटनेचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : सोमवारपर्यंत न्यायालयात सुनावणी होत नसल्यामुळे एखाद्याला डावपेच आखत शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करेपर्यंत कोठडीत ठेवणे हे घटनेचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.बऱ्याचदा शिक्षा संपूनही कैद्यांना कारागृहात ठेवले जाते. तिहार कारागृहात जास्त काळ कैदेत ठेवल्याबद्दल तक्रार स्वीकारण्याची कोणतीही यंत्रणा नाही, त्याबद्दल नुकसानभरपाईही दिली जात नसल्याबद्दल केंद्रीय माहिती आयुक्त (सीआयसी) श्रीधर आचार्यलू यांनी कारागृह अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोणत्याही कैद्याला मुदतीपेक्षा जास्त काळ कारागृहात ठेवू नये. माहिती अधिकार कायद्यानुसार स्वत:हून त्याबाबत माहिती द्यावी, असेही ते आदेशात म्हणाले. न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेपेक्षा एक दिवसही जास्त काळ कारागृहात ठेवल्याने वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावले जाते. साधारणपणे शुक्रवारी रात्री अटक करून आरोपींना सोमवारपर्यंत ताब्यात ठेवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे ताब्यात ठेवणे हे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन असून, तो गुन्हा ठरतो. कैद्यांना अधिक काळ कैदेत ठेवताना त्यांची कोणतीही तक्रार ऐकून न घेणे, त्यांना त्याबद्दल नुकसानभरपाई न देणे आरटीआयअंतर्गत कैद्यांना माहिती न पुरविणे ही तिहार कारागृह अधिकाऱ्यांची पद्धत चुकीची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.सीआयसीकडे धाव> कैदी ओ.पी. गांधी यांनी तिहार कारागृहाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सीआयसीकडे धाव घेतली होती. त्यांनी आयोगाकडे तिहार कारागृहाने ठोठावलेल्या एकूण शिक्षेपेक्षा चार दिवस जास्त काळ कैदेत ठेवल्याची तक्रार केली होती.गांधी यांनी तिहार कारागृहात तक्रार स्वीकारण्यासाठी कोणतीही अंतर्गत यंत्रणा नसल्याकडे लक्ष वेधले. त्यावर आचार्यलू यांनी अर्जदाराला चुकीच्या पद्धतीने ताब्यात ठेवल्याबद्दल सनदी किंवा फौजदारी न्यायालयाकडेच दाद मागण्याशिवाय अन्य पर्याय दिसत नसल्याचे नमूद करताना कारागृह अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली. आचार्यलू हे हैदराबादच्या नलसार येथे कायद्याचे प्रोफेसर राहिले आहेत.