शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

शुक्रवारी अटकेचा डाव हे घटनेचे उल्लंघन

By admin | Updated: July 5, 2015 23:18 IST

शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करेपर्यंत कोठडीत ठेवणे हे घटनेचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : सोमवारपर्यंत न्यायालयात सुनावणी होत नसल्यामुळे एखाद्याला डावपेच आखत शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करेपर्यंत कोठडीत ठेवणे हे घटनेचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.बऱ्याचदा शिक्षा संपूनही कैद्यांना कारागृहात ठेवले जाते. तिहार कारागृहात जास्त काळ कैदेत ठेवल्याबद्दल तक्रार स्वीकारण्याची कोणतीही यंत्रणा नाही, त्याबद्दल नुकसानभरपाईही दिली जात नसल्याबद्दल केंद्रीय माहिती आयुक्त (सीआयसी) श्रीधर आचार्यलू यांनी कारागृह अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोणत्याही कैद्याला मुदतीपेक्षा जास्त काळ कारागृहात ठेवू नये. माहिती अधिकार कायद्यानुसार स्वत:हून त्याबाबत माहिती द्यावी, असेही ते आदेशात म्हणाले. न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेपेक्षा एक दिवसही जास्त काळ कारागृहात ठेवल्याने वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावले जाते. साधारणपणे शुक्रवारी रात्री अटक करून आरोपींना सोमवारपर्यंत ताब्यात ठेवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे ताब्यात ठेवणे हे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन असून, तो गुन्हा ठरतो. कैद्यांना अधिक काळ कैदेत ठेवताना त्यांची कोणतीही तक्रार ऐकून न घेणे, त्यांना त्याबद्दल नुकसानभरपाई न देणे आरटीआयअंतर्गत कैद्यांना माहिती न पुरविणे ही तिहार कारागृह अधिकाऱ्यांची पद्धत चुकीची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.सीआयसीकडे धाव> कैदी ओ.पी. गांधी यांनी तिहार कारागृहाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सीआयसीकडे धाव घेतली होती. त्यांनी आयोगाकडे तिहार कारागृहाने ठोठावलेल्या एकूण शिक्षेपेक्षा चार दिवस जास्त काळ कैदेत ठेवल्याची तक्रार केली होती.गांधी यांनी तिहार कारागृहात तक्रार स्वीकारण्यासाठी कोणतीही अंतर्गत यंत्रणा नसल्याकडे लक्ष वेधले. त्यावर आचार्यलू यांनी अर्जदाराला चुकीच्या पद्धतीने ताब्यात ठेवल्याबद्दल सनदी किंवा फौजदारी न्यायालयाकडेच दाद मागण्याशिवाय अन्य पर्याय दिसत नसल्याचे नमूद करताना कारागृह अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली. आचार्यलू हे हैदराबादच्या नलसार येथे कायद्याचे प्रोफेसर राहिले आहेत.