शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण चित्र विदारकच!

By admin | Updated: July 4, 2015 04:04 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके पूर्ण होत असताना अणि खासकरून गेल्या २० वर्षांत वेगाने आर्थिक विकास होऊनही ग्रामीण भारताचे चित्र आजही विदारक असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारने केलेल्या

नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके पूर्ण होत असताना अणि खासकरून गेल्या २० वर्षांत वेगाने आर्थिक विकास होऊनही ग्रामीण भारताचे चित्र आजही विदारक असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारने केलेल्या सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणनेत (एसईसीसी-२०११) मध्ये अधिकृतपणे नोंदविण्यात आला आहे. विकासगंगा तळागाळापर्यंत न झिरपल्याने खेड्यातील प्रत्येक तीन कुटुंबांपैकी एक कुटुंब भूमिहीन आणि उदरनिर्वाह चालविण्यासाठी हातमजुरीवर अवलंबून असल्याचे या जनगणनेवरून स्पष्ट होते.सरकारद्वारा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या आधारे करण्यात आलेली ही देशातील पहिलीच कागदविरहित जनगणना आहे. १९३२ नंतर ही पहिलीच जनगणना आहे, ज्यात प्रांत विशेष, समुदाय, जाती आणि आर्थिक समूहासंबंधी विविध प्रकारचा तपशील आहे आणि कुटुंबांच्या विकासाचे त्यात आकलन करण्यात आले आहे.

या जनगणनेत सर्व ग्रामीण कुटुंबांमध्ये ज्यांचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांपेक्षा जास्त नाही किंवा ज्यांच्याजवळ मोटार, मासेमारी नौका वा किसान क्रेडिट कार्ड नाही, अशा ७.०५ (३९.३९ टक्के) कुटुंबांना ‘बाहेर ठेवलेले कुटुंब’ संबोधण्यात आले आहे.

ग्रामीण कुटुंबांपैकी ५.३९ कोटी कुटुंबांची उपजीविका शेतीवर निर्भर आहे. ९.१६ कोटी कुटुंबे हातमजुरी करून तर किमान ४४.८४ लाख कुटुंबे दुसऱ्याच्या घरी घरकाम करून उपजीविका चालवितात. ४.०८ लाख कुटुंबे कचरा वेचून, तर ६.६८ लाख कुटुंबे भीक मागून पोट भरतात.

जातींच्या संख्येबाबत मौनसरकारने सामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली असली, तरी त्यात जातींच्या संख्येबाबत मात्र मौन पाळले आहे. या जनगणनेत जातींचा उल्लेख का नाही, या प्रश्नाला ग्रामीण विकासमंत्री चौधरी बीरेंद्र सिंग यांनी बगल दिली. जनगणना करण्याचे रजिस्ट्रार जनरल (जनगणना) यांच्या अधिकारात येते. तेच या प्रश्नावर बोलू शकतील.भारताची वास्तविकता जाहीर होईल. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व धोरण निर्धारकांसाठी हा दस्ताऐवज अतिशय महत्त्वाचा ठरेल. सरकारला उत्तम धोरण तयार करण्यास मदत होईल. -अरुण जेटली, केंद्रीय वित्तमंत्री