शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

खेडय़ात 32 रुपये, तर शहरात 47 रुपये कमावणारा गरीब नाही

By admin | Updated: July 8, 2014 02:19 IST

खेडय़ात दिवसाला 32 तर शहरात 47 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा गरीब नाही, अशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीने सरकारकडे केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असताना नवा वाद उफाळला आहे.

नवी दिल्ली : खेडय़ात दिवसाला 32 तर शहरात 47 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा गरीब नाही, अशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीने सरकारकडे केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असताना नवा वाद उफाळला आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणा:या महागाईमुळे देशभरात वातावरण तापले असताना हा जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
दारिद्रय़ासंबंधी आणि आकलनासंबंधी आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याची कबुली ज्येष्ठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिली आहे. हा मुद्दा योग्य स्तरावर लावून धरणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दारिद्रय़रेषेचे नव्याने मूल्यांकन करणारा हा अहवाल रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सी. रंगराजन यांच्या नेतृत्वातील तज्ज्ञांच्या समितीने तयार केलेला आहे हे विशेष. या समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालात तीनपैकी एक भारतीय गरीब असल्याचा निष्कर्षही काढला आहे. 2क्11-12 मध्ये 36.3 कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली आढळून आले. याआधीच्या आकलनाच्या तुलनेत प्रत्यक्षात ही संख्या किमान 1क् कोटींनी जास्त आहे. 
डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या काळात योजना आयोगाने 2क्11 मध्ये खेडय़ांमध्ये 27 रुपये तर शहरांत 33 रुपये दररोजची कमाई असलेल्यांना दारिद्रय़रेषेवरचे ठरविणारा तसेच ते सबसिडीचे अन्न आणि रेशनमधून अन्य वस्तूंच्या पुरवठय़ास अपात्र ठरत असल्याचा अहवाल दिल्यानंतर विरोधकांनी रान उठविले होते. उपरोक्त रकमेपेक्षा जास्त कमाई असणा:या लोकांकडे अन्न, शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा पैसा असल्याचा दावा योजना आयोगाने त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना केला होता. त्यावेळी दारिद्रय़विषयक तज्ज्ञांनी महागाईच्या पाश्र्वभूमीवर ही आकडेवारी अवास्तव असल्याचे दाखले दिले होते. चौफेर टीका झाल्यानंतर संपुआ सरकारने त्यावेळी दारिद्रय़  निमरूलन कार्यक्रमासाठी 33 रुपये उत्पन्नाचा निकष काढून टाकला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4डॉ. रंगराजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाने नव्याने मूल्यांकन करताना खेडय़ात केवळ 5 रुपये तर शहरात 14 रुपयांची दैनंदिन उत्पन्नवाढ प्रमाण मानली आहे. यापूर्वीची वादग्रस्त आकडेवारीत किंचित वाढ केल्यामुळे पुन्हा एकदा वाद उभा ठाकला आहे.
 
या आकडेवारीतून सर्वसाधारण किंवा आर्थिक समज कुठेही दिसत नाही. देशातील एकतृतीयांश लोकसंख्या दारिद्रय़ात आहे, असे डाव्या आघाडीचे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितले.
 
आम्ही रंगराजन यांना दररोज 1क्क् रुपये देऊ. त्यांनी खेडय़ात जगून दाखवावे, असे समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सांगितले.