शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

खेडय़ात 32 रुपये, तर शहरात 47 रुपये कमावणारा गरीब नाही

By admin | Updated: July 8, 2014 02:19 IST

खेडय़ात दिवसाला 32 तर शहरात 47 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा गरीब नाही, अशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीने सरकारकडे केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असताना नवा वाद उफाळला आहे.

नवी दिल्ली : खेडय़ात दिवसाला 32 तर शहरात 47 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा गरीब नाही, अशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीने सरकारकडे केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असताना नवा वाद उफाळला आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणा:या महागाईमुळे देशभरात वातावरण तापले असताना हा जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
दारिद्रय़ासंबंधी आणि आकलनासंबंधी आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याची कबुली ज्येष्ठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिली आहे. हा मुद्दा योग्य स्तरावर लावून धरणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दारिद्रय़रेषेचे नव्याने मूल्यांकन करणारा हा अहवाल रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सी. रंगराजन यांच्या नेतृत्वातील तज्ज्ञांच्या समितीने तयार केलेला आहे हे विशेष. या समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालात तीनपैकी एक भारतीय गरीब असल्याचा निष्कर्षही काढला आहे. 2क्11-12 मध्ये 36.3 कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली आढळून आले. याआधीच्या आकलनाच्या तुलनेत प्रत्यक्षात ही संख्या किमान 1क् कोटींनी जास्त आहे. 
डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या काळात योजना आयोगाने 2क्11 मध्ये खेडय़ांमध्ये 27 रुपये तर शहरांत 33 रुपये दररोजची कमाई असलेल्यांना दारिद्रय़रेषेवरचे ठरविणारा तसेच ते सबसिडीचे अन्न आणि रेशनमधून अन्य वस्तूंच्या पुरवठय़ास अपात्र ठरत असल्याचा अहवाल दिल्यानंतर विरोधकांनी रान उठविले होते. उपरोक्त रकमेपेक्षा जास्त कमाई असणा:या लोकांकडे अन्न, शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा पैसा असल्याचा दावा योजना आयोगाने त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना केला होता. त्यावेळी दारिद्रय़विषयक तज्ज्ञांनी महागाईच्या पाश्र्वभूमीवर ही आकडेवारी अवास्तव असल्याचे दाखले दिले होते. चौफेर टीका झाल्यानंतर संपुआ सरकारने त्यावेळी दारिद्रय़  निमरूलन कार्यक्रमासाठी 33 रुपये उत्पन्नाचा निकष काढून टाकला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4डॉ. रंगराजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाने नव्याने मूल्यांकन करताना खेडय़ात केवळ 5 रुपये तर शहरात 14 रुपयांची दैनंदिन उत्पन्नवाढ प्रमाण मानली आहे. यापूर्वीची वादग्रस्त आकडेवारीत किंचित वाढ केल्यामुळे पुन्हा एकदा वाद उभा ठाकला आहे.
 
या आकडेवारीतून सर्वसाधारण किंवा आर्थिक समज कुठेही दिसत नाही. देशातील एकतृतीयांश लोकसंख्या दारिद्रय़ात आहे, असे डाव्या आघाडीचे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितले.
 
आम्ही रंगराजन यांना दररोज 1क्क् रुपये देऊ. त्यांनी खेडय़ात जगून दाखवावे, असे समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सांगितले.