शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

खेडय़ात 32 रुपये, तर शहरात 47 रुपये कमावणारा गरीब नाही

By admin | Updated: July 8, 2014 02:19 IST

खेडय़ात दिवसाला 32 तर शहरात 47 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा गरीब नाही, अशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीने सरकारकडे केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असताना नवा वाद उफाळला आहे.

नवी दिल्ली : खेडय़ात दिवसाला 32 तर शहरात 47 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा गरीब नाही, अशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीने सरकारकडे केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असताना नवा वाद उफाळला आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणा:या महागाईमुळे देशभरात वातावरण तापले असताना हा जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
दारिद्रय़ासंबंधी आणि आकलनासंबंधी आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याची कबुली ज्येष्ठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिली आहे. हा मुद्दा योग्य स्तरावर लावून धरणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दारिद्रय़रेषेचे नव्याने मूल्यांकन करणारा हा अहवाल रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सी. रंगराजन यांच्या नेतृत्वातील तज्ज्ञांच्या समितीने तयार केलेला आहे हे विशेष. या समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालात तीनपैकी एक भारतीय गरीब असल्याचा निष्कर्षही काढला आहे. 2क्11-12 मध्ये 36.3 कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली आढळून आले. याआधीच्या आकलनाच्या तुलनेत प्रत्यक्षात ही संख्या किमान 1क् कोटींनी जास्त आहे. 
डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या काळात योजना आयोगाने 2क्11 मध्ये खेडय़ांमध्ये 27 रुपये तर शहरांत 33 रुपये दररोजची कमाई असलेल्यांना दारिद्रय़रेषेवरचे ठरविणारा तसेच ते सबसिडीचे अन्न आणि रेशनमधून अन्य वस्तूंच्या पुरवठय़ास अपात्र ठरत असल्याचा अहवाल दिल्यानंतर विरोधकांनी रान उठविले होते. उपरोक्त रकमेपेक्षा जास्त कमाई असणा:या लोकांकडे अन्न, शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा पैसा असल्याचा दावा योजना आयोगाने त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना केला होता. त्यावेळी दारिद्रय़विषयक तज्ज्ञांनी महागाईच्या पाश्र्वभूमीवर ही आकडेवारी अवास्तव असल्याचे दाखले दिले होते. चौफेर टीका झाल्यानंतर संपुआ सरकारने त्यावेळी दारिद्रय़  निमरूलन कार्यक्रमासाठी 33 रुपये उत्पन्नाचा निकष काढून टाकला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4डॉ. रंगराजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाने नव्याने मूल्यांकन करताना खेडय़ात केवळ 5 रुपये तर शहरात 14 रुपयांची दैनंदिन उत्पन्नवाढ प्रमाण मानली आहे. यापूर्वीची वादग्रस्त आकडेवारीत किंचित वाढ केल्यामुळे पुन्हा एकदा वाद उभा ठाकला आहे.
 
या आकडेवारीतून सर्वसाधारण किंवा आर्थिक समज कुठेही दिसत नाही. देशातील एकतृतीयांश लोकसंख्या दारिद्रय़ात आहे, असे डाव्या आघाडीचे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितले.
 
आम्ही रंगराजन यांना दररोज 1क्क् रुपये देऊ. त्यांनी खेडय़ात जगून दाखवावे, असे समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सांगितले.