शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - राजू शेट्टी, मेधा पाटकर यांना अटक

By admin | Updated: July 6, 2017 13:33 IST

ऑनलाइन लोकमत बुढा, दि.6- मध्यप्रदेशात कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आदोलनाला हिंसक वळणही ...

ऑनलाइन लोकमत

बुढा, दि.6- मध्यप्रदेशात कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. याच पार्श्वभूमीवर शेती मालाला योग्य भाव आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींनी किसान मुक्ती यात्रा काढली. पण ही किसान मुक्ती यात्रा अडवण्यात आली असून, पोलिसांनी खासदार राजू शेट्टींसह, मेधा पाटकर, रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे,सागर संभुशेटे यांना अटक केली आहे तसेच  पोलिसांनी रॅपिड अॅक्शन फोर्स , वॉटर गनसह हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. 
 
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली आहे. या मोर्चात राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव तसंच 25 राज्यातले शेतकरी सहभागी झाले आहे. बूढामध्ये या किसान मुक्ती यात्रेसाठी 600 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिल्लीत पोहणार आहे. तसंच  दिल्लीत पोहोचल्यानंतर 18 जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील शेतकऱ्यांनी एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच जतंरमंतरवर शेतकरी नेते आणि शेतकरी आंदोलनही करणार आहेत. 
 
 
 
देशातील जवळपास 130 शेतकरी संघटानांनी एकत्र येत किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना केली आहे.  आजपासून म्हणजेच 6 जुलैपासून सुरू झालेल्या या संघर्ष यात्रेची सांगता 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसंच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जावी, या दोन प्रमुख मागण्या या आंदोलनातून मांडल्या जात आहेत. खरंतर पिपलियामंडी येथून निघणाऱ्या यात्रेला प्रशासनाने कुठलीही परवानगी दिली नव्हती पण गुरूवारी सकाळी सुरू झालेली यात्रा मंदसौरमधील बुढापर्यंत पोहचली आहे. 
 
 
या यात्रेत देशभरातील 130 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होतील. 18 जुलैला ही यात्रा दिल्लीत पोहचेल. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशा मागण्या या यात्रेत असतील.”, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती.
आणखी वाचा
 

भुजबळ यांच्या ३00 कोटींच्या मालमत्तांवर टाच

सोशल मीडियावर शब्द जपून वापरा, अन्यथा लागणार ‘अॅट्रॉसिटी’

आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी १२ ‘वॉकी-टॉकी’

श्रद्धांजली सभेला परवानगी नाकारली

गेल्या महिन्यात मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर मध्यप्रदेश पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर किसान मुक्ती यात्रेची सुरुवात मंदसौरपासून होत आहे. सुरुवातीला बही चौपाटीवर ६ जुलैला सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा होणार होती. त्यास मध्यप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली असून सर्वत्र चोख बंदोबस्त आहे. दरम्यान सरकारचा विरोध असला तरी श्रद्धांजली सभा होणारच असा निर्धार शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.
 

https://www.dailymotion.com/video/x84574e