शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

Video : मोदींच्या VIP कल्चरला ठेंगा, गृहमंत्र्यासाठी 5 किमी रस्ता जॅम

By admin | Updated: July 10, 2017 16:22 IST

केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवा कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने एक मे रोजी लागू केला होता. पण

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवा कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने एक मे रोजी लागू केला होता. पण मोदींनी घेतलेल्या या निर्णयला मध्यप्रदेशमधील गृहमंत्र्यांनी ठेंगा दाखवला आहे. मध्यप्रदेशमधील सांरगपूरमध्ये गृहमंत्री उमाशंकर गुप्ता एका ट्रॅफ्रिक जॅममध्ये फसले होते. हा जाम चक्क पाच कि.मीचा होता. मंत्रीमहोदयांना एका कार्यक्रमाला जाण्यासाठी उशीर होत होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांना जाण्यासाठी रस्ता खाली करण्याचे आदेश दिले. 

गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या या आदेशानंतर पोलिसांनी रस्ता खाली करण्यास सुरुवात केली. त्यांना जाण्यासाठी पाच किमीचा रस्ता पुर्णपणे जॅम झाला होता. मंत्रीमहोदय त्या जॅममधून बाहेर पडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. त्याचवेळी  जॅममधून हळूहळू पुढे सरकणारी वाहणे जागीच थांबली. गाडीचा सायरन वाजवत गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या वाहनाचा ताफा पुढे सरकत होता. गृहमंत्र्यांचा ताफा बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पाच किमीच्या रसत्यावरुन एकाही वाहनाला जाग्यावरुन हलू दिलं नाही. 
गृहमंत्री उमाशंकर गुप्ता राष्ट्रीय हायवे क्रमांक तीन वरुन जात असताना हा ट्रॅफीक जॅम लागला होता. मंत्री जोपर्यंत ट्रॅफीक जॅमधून बाहेर निघत नाहीत तोपर्यंत बाईक, कार, साइकल, ट्रक सारखी वाहने रसत्याच्या एका बाजूला उभे होती. दरम्यान, गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी हा जॅम का झाला आहे? हे विचारण्यासही विसरले. 

आणखी वाचा -  

गाडीवरील लाल दिवा हटवण्यास मंत्र्याचा नकार

गाडीसारखा मनातूनही लाल दिवा काढून टाका- नरेंद्र मोदी

 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला वाट मोकळी करून दिली. केंद्र सरकारनं लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा लाभ घेणा-यांनी गाडीतूनच नव्हे, तर मनातूनही लाल दिव्याचा मोह काढून टाकावा. देशात VIP कल्चरचा द्वेष केला जातो. मात्र तो द्वेष एवढा खोलवर गेल्याचा मला आताच अनुभव झाला. न्यू इंडियात आता व्हीआयपीच्या ऐवजी EPI (Every Person is Important) वर भर देण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांनाही आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे.