शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

Video : मोदींच्या VIP कल्चरला ठेंगा, गृहमंत्र्यासाठी 5 किमी रस्ता जॅम

By admin | Updated: July 10, 2017 16:22 IST

केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवा कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने एक मे रोजी लागू केला होता. पण

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवा कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने एक मे रोजी लागू केला होता. पण मोदींनी घेतलेल्या या निर्णयला मध्यप्रदेशमधील गृहमंत्र्यांनी ठेंगा दाखवला आहे. मध्यप्रदेशमधील सांरगपूरमध्ये गृहमंत्री उमाशंकर गुप्ता एका ट्रॅफ्रिक जॅममध्ये फसले होते. हा जाम चक्क पाच कि.मीचा होता. मंत्रीमहोदयांना एका कार्यक्रमाला जाण्यासाठी उशीर होत होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांना जाण्यासाठी रस्ता खाली करण्याचे आदेश दिले. 

गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या या आदेशानंतर पोलिसांनी रस्ता खाली करण्यास सुरुवात केली. त्यांना जाण्यासाठी पाच किमीचा रस्ता पुर्णपणे जॅम झाला होता. मंत्रीमहोदय त्या जॅममधून बाहेर पडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. त्याचवेळी  जॅममधून हळूहळू पुढे सरकणारी वाहणे जागीच थांबली. गाडीचा सायरन वाजवत गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या वाहनाचा ताफा पुढे सरकत होता. गृहमंत्र्यांचा ताफा बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पाच किमीच्या रसत्यावरुन एकाही वाहनाला जाग्यावरुन हलू दिलं नाही. 
गृहमंत्री उमाशंकर गुप्ता राष्ट्रीय हायवे क्रमांक तीन वरुन जात असताना हा ट्रॅफीक जॅम लागला होता. मंत्री जोपर्यंत ट्रॅफीक जॅमधून बाहेर निघत नाहीत तोपर्यंत बाईक, कार, साइकल, ट्रक सारखी वाहने रसत्याच्या एका बाजूला उभे होती. दरम्यान, गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी हा जॅम का झाला आहे? हे विचारण्यासही विसरले. 

आणखी वाचा -  

गाडीवरील लाल दिवा हटवण्यास मंत्र्याचा नकार

गाडीसारखा मनातूनही लाल दिवा काढून टाका- नरेंद्र मोदी

 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला वाट मोकळी करून दिली. केंद्र सरकारनं लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा लाभ घेणा-यांनी गाडीतूनच नव्हे, तर मनातूनही लाल दिव्याचा मोह काढून टाकावा. देशात VIP कल्चरचा द्वेष केला जातो. मात्र तो द्वेष एवढा खोलवर गेल्याचा मला आताच अनुभव झाला. न्यू इंडियात आता व्हीआयपीच्या ऐवजी EPI (Every Person is Important) वर भर देण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांनाही आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे.