शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : २७ वर्षांनंतरही काश्मिरी पंडित स्वत:च्याच देशात निर्वासित - अनुपम खेर

By admin | Updated: January 19, 2017 12:31 IST

अभिनेता अनुपम खेर यांनी 'फैलेगा हमारा मौन' या कवितेतून काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वाढत्या हिंसाचारामुळे दोन दशकांपूर्वी काश्मीर खो-यातील अनेक काश्मिरी पंडितांच्या कुटुंबियांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती. या घटनेला आज २७ वर्ष उलटली असून त्याच पार्श्वभूमीवर गुणवान अभिनेते आणि तितकेच संवेदनशील व्यक्ती असलेले अनुपम खेर यांनी एका व्हिडीओतून काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडल्या आहेत. खेर हे स्वत:सुद्धा काश्मिरी पंडित असून, आजपर्यंत अनेकवेळा त्यांनी या मुद्यावर भाष्य करत काश्मिरी पंडितांच्या समस्या लोकांसमोर मांडल्या आहेत.
काश्मिरी पंडितांचा आवाज सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी खेर यांनी ' फैलेगा हमारा मौन' या कवितेतून खेर यांनी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही या कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ' २७ वर्षांनंतरही आम्ही काश्मिरी पंडित आमच्या स्वत:च्याच देशात निर्वासितांप्रमाणे राहात आहोत, हे त्याचबाबतचे अधःपतन आहे’ असेही त्यांनी आपल्आ ट्विटमध्ये नमूद केले आहे. डॉ. शशी शेखर तोषकानी यांनी ही कविता लिहीली असून अशोक पंडित यांनी हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. 
या मुद्यावर खेर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशीही संवाद साधला. ' १९ जानेवारी हा दिवस काही साजरा करण्यात येत नाही. पण त्या दिवशी झालेल्या घटनेच्या स्मरणार्थ, पुन्हा सर्वांचे लक्ष या मुद्याकडे वेधण्यासाठी आम्ही हा (व्हिडीओचा) अनोखा मार्ग अवलंबला आहे. ज्यांना काश्मिरी पंडितांच्या समाजाच्या व्यथा ऐकाव्याश्या वाटत नाहीत त्या लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे' असे त्यांनी नमूद केले.