शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

VIDEO : २७ वर्षांनंतरही काश्मिरी पंडित स्वत:च्याच देशात निर्वासित - अनुपम खेर

By admin | Updated: January 19, 2017 12:31 IST

अभिनेता अनुपम खेर यांनी 'फैलेगा हमारा मौन' या कवितेतून काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वाढत्या हिंसाचारामुळे दोन दशकांपूर्वी काश्मीर खो-यातील अनेक काश्मिरी पंडितांच्या कुटुंबियांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती. या घटनेला आज २७ वर्ष उलटली असून त्याच पार्श्वभूमीवर गुणवान अभिनेते आणि तितकेच संवेदनशील व्यक्ती असलेले अनुपम खेर यांनी एका व्हिडीओतून काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडल्या आहेत. खेर हे स्वत:सुद्धा काश्मिरी पंडित असून, आजपर्यंत अनेकवेळा त्यांनी या मुद्यावर भाष्य करत काश्मिरी पंडितांच्या समस्या लोकांसमोर मांडल्या आहेत.
काश्मिरी पंडितांचा आवाज सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी खेर यांनी ' फैलेगा हमारा मौन' या कवितेतून खेर यांनी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही या कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ' २७ वर्षांनंतरही आम्ही काश्मिरी पंडित आमच्या स्वत:च्याच देशात निर्वासितांप्रमाणे राहात आहोत, हे त्याचबाबतचे अधःपतन आहे’ असेही त्यांनी आपल्आ ट्विटमध्ये नमूद केले आहे. डॉ. शशी शेखर तोषकानी यांनी ही कविता लिहीली असून अशोक पंडित यांनी हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. 
या मुद्यावर खेर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशीही संवाद साधला. ' १९ जानेवारी हा दिवस काही साजरा करण्यात येत नाही. पण त्या दिवशी झालेल्या घटनेच्या स्मरणार्थ, पुन्हा सर्वांचे लक्ष या मुद्याकडे वेधण्यासाठी आम्ही हा (व्हिडीओचा) अनोखा मार्ग अवलंबला आहे. ज्यांना काश्मिरी पंडितांच्या समाजाच्या व्यथा ऐकाव्याश्या वाटत नाहीत त्या लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे' असे त्यांनी नमूद केले.