शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:37 IST

Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून ...

Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली आणि पळ काढला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिम हाती घेतली आहे. सरकारनेही पाकिस्तानविरोधात कडक पावले उचचली आहेत. सिंधू करार स्थगित करण्यासोबत भारताने पाच मोठे निर्णय घेतले. दुसरीकडे या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अटारी वाघा सीमेवरही पाहायला मिळाला. भारत सरकारने अटारी बॉर्डरजवळील चेकपोस्ट बंद केली आहे. त्यानंतर अटारी बॉर्डरवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल पाहायला मिळाला.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे रिट्रीट समारंभात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटियरने दिलेल्या माहितीनुसार अटारी-वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी दरम्यान भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यात प्रतीकात्मक हस्तांदोलनाची परंपरा बंद केली जाईल. याशिवाय, कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंद राहतील. पहलगाममधील अलिकडच्याच दुःखद हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे रिट्रीट सेरेमनीच्या वेळी होणाऱ्या समारंभ मर्यादित स्वरुपाचा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे  पंजाब फ्रंटियरने सांगितले.

त्यानुसार संध्याकाळी अटारी-वाघा सीमेवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल दिसून आला. नेहमी बीएसएफ आणि पाक रेंजर्सच्या जवानांमध्ये  औपचारिक हस्तांदोलन होते. परंतु यावेळी ना दरवाजे उघडले गेले आणि ना हस्तांदोलन झाले. अटारी सीमेवर झालेल्या रिट्रीट सेरेमनीमध्ये दोन्ही देशांचे दरवाजे उघडले गेले नाहीत. दोन्ही देशांचे झेंडे बंद दरवाज्यांमध्ये खाली उतरवण्यात आले. बीएसएफ जवानांनी पाक रेंजर्सशी हात मिळवले नाहीत. तसेच आजच्या समारंभात लोकांची संख्याही कमी होती. यााधी दररोज सुमारे २० हजार लोक उपस्थित असत. मात्र आज केवळ १० हजार लोक उपस्थित होते.

दरम्यान, २६ लोकांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले . त्यानुसार आज १०५ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले. त २८ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल पर्यंत वैध असतील. देशात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा कालावधी संपण्यापूर्वी भारत सोडावा लागणार आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान