शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:37 IST

Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून ...

Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली आणि पळ काढला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिम हाती घेतली आहे. सरकारनेही पाकिस्तानविरोधात कडक पावले उचचली आहेत. सिंधू करार स्थगित करण्यासोबत भारताने पाच मोठे निर्णय घेतले. दुसरीकडे या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अटारी वाघा सीमेवरही पाहायला मिळाला. भारत सरकारने अटारी बॉर्डरजवळील चेकपोस्ट बंद केली आहे. त्यानंतर अटारी बॉर्डरवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल पाहायला मिळाला.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे रिट्रीट समारंभात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटियरने दिलेल्या माहितीनुसार अटारी-वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी दरम्यान भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यात प्रतीकात्मक हस्तांदोलनाची परंपरा बंद केली जाईल. याशिवाय, कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंद राहतील. पहलगाममधील अलिकडच्याच दुःखद हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे रिट्रीट सेरेमनीच्या वेळी होणाऱ्या समारंभ मर्यादित स्वरुपाचा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे  पंजाब फ्रंटियरने सांगितले.

त्यानुसार संध्याकाळी अटारी-वाघा सीमेवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल दिसून आला. नेहमी बीएसएफ आणि पाक रेंजर्सच्या जवानांमध्ये  औपचारिक हस्तांदोलन होते. परंतु यावेळी ना दरवाजे उघडले गेले आणि ना हस्तांदोलन झाले. अटारी सीमेवर झालेल्या रिट्रीट सेरेमनीमध्ये दोन्ही देशांचे दरवाजे उघडले गेले नाहीत. दोन्ही देशांचे झेंडे बंद दरवाज्यांमध्ये खाली उतरवण्यात आले. बीएसएफ जवानांनी पाक रेंजर्सशी हात मिळवले नाहीत. तसेच आजच्या समारंभात लोकांची संख्याही कमी होती. यााधी दररोज सुमारे २० हजार लोक उपस्थित असत. मात्र आज केवळ १० हजार लोक उपस्थित होते.

दरम्यान, २६ लोकांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले . त्यानुसार आज १०५ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले. त २८ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल पर्यंत वैध असतील. देशात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा कालावधी संपण्यापूर्वी भारत सोडावा लागणार आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान