शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:37 IST

Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून ...

Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली आणि पळ काढला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिम हाती घेतली आहे. सरकारनेही पाकिस्तानविरोधात कडक पावले उचचली आहेत. सिंधू करार स्थगित करण्यासोबत भारताने पाच मोठे निर्णय घेतले. दुसरीकडे या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अटारी वाघा सीमेवरही पाहायला मिळाला. भारत सरकारने अटारी बॉर्डरजवळील चेकपोस्ट बंद केली आहे. त्यानंतर अटारी बॉर्डरवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल पाहायला मिळाला.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे रिट्रीट समारंभात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटियरने दिलेल्या माहितीनुसार अटारी-वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी दरम्यान भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यात प्रतीकात्मक हस्तांदोलनाची परंपरा बंद केली जाईल. याशिवाय, कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंद राहतील. पहलगाममधील अलिकडच्याच दुःखद हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे रिट्रीट सेरेमनीच्या वेळी होणाऱ्या समारंभ मर्यादित स्वरुपाचा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे  पंजाब फ्रंटियरने सांगितले.

त्यानुसार संध्याकाळी अटारी-वाघा सीमेवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल दिसून आला. नेहमी बीएसएफ आणि पाक रेंजर्सच्या जवानांमध्ये  औपचारिक हस्तांदोलन होते. परंतु यावेळी ना दरवाजे उघडले गेले आणि ना हस्तांदोलन झाले. अटारी सीमेवर झालेल्या रिट्रीट सेरेमनीमध्ये दोन्ही देशांचे दरवाजे उघडले गेले नाहीत. दोन्ही देशांचे झेंडे बंद दरवाज्यांमध्ये खाली उतरवण्यात आले. बीएसएफ जवानांनी पाक रेंजर्सशी हात मिळवले नाहीत. तसेच आजच्या समारंभात लोकांची संख्याही कमी होती. यााधी दररोज सुमारे २० हजार लोक उपस्थित असत. मात्र आज केवळ १० हजार लोक उपस्थित होते.

दरम्यान, २६ लोकांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले . त्यानुसार आज १०५ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले. त २८ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल पर्यंत वैध असतील. देशात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा कालावधी संपण्यापूर्वी भारत सोडावा लागणार आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान