विदर्भ- चंद्रपूर वीज केंद्र
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
चंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आगचंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आग लाखो रुपयांचे नुकसान : संच सुरु होण्यास लागणार आणखी कालावधीफोटो ओळफोटो क्र.-०९सीपीपी १९ - वीज केंद्रातील नवव्या क्रमांकाच्या संचाला आग लागल्यानंतर असा धूर निघत होता.दुर्गापूर(चंद्रपूर) : येथील वीज केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पातील नवव्या संचाचे बांधकाम अंतिम ...
विदर्भ- चंद्रपूर वीज केंद्र
चंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आगचंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आग लाखो रुपयांचे नुकसान : संच सुरु होण्यास लागणार आणखी कालावधीफोटो ओळफोटो क्र.-०९सीपीपी १९ - वीज केंद्रातील नवव्या क्रमांकाच्या संचाला आग लागल्यानंतर असा धूर निघत होता.दुर्गापूर(चंद्रपूर) : येथील वीज केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पातील नवव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान येथील कुलींग टॉवरमध्ये काम सुरु असताना अचानक आग लागली. यामुळे संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संच सुरु होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात ५०० मेगॉवॅटच्या दोन नव्या संचाचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी नवव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारी सकाळी या संचाच्या कुलींग टॉवरमध्ये आतुन फिन्स नावाचे पॉलीमर मटेरियल लावण्याचे काम सुरू होते. सदर काम मे बीजीआर या मुख्य कंपनीने हाईग्रीवा या कंपनीला पेटी कंत्राट दिले आहे. या कंपनीतील कर्मचारी संचाच्या आत काम करीत असताना अचानक आगीचे लोळ दिसले. संचाच्या अगदी शेजारी अशाच मटेरियलचा मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्यात आला होता. आगीचे स्वरुप बघता लगेच साठा हटविण्यात आला. त्यामुळे मोठी वित्त हानी टळली. आग विझविण्यासाठी वीज केंद्रातील चार तथा महानगरपालिकेची एक गाडी पोहचली. त्यानंतर काही वेळातच ही आग आटोक्यात आली. या आगीत संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, नवव्या संचाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसातच संच सुरु होणार होता. अशातच आता कुलिंग टॉवरला आग लागल्याने परत काम करावे लागणार आहे. त्यामुळे हा संच सुरू होण्यास आणखी विलंब होणार आहे. येथे कार्यरत कंपन्या मंदगतीने संच निर्मितीचेे काम करीत आहे. त्यामुळेे अपेक्षीत अवधीपेक्षा संच सुरू होण्यास बराच विलंब झाला आहे. कसे बसे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात येथे सुरक्षेला बगल दिल्या जात आहे. (वार्ताहर)