शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
3
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
4
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
5
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
6
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
7
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
8
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
9
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
10
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
11
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
12
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
13
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
14
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
15
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
16
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
17
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅटची पडताळणी मतमोजणीच्या आधी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 06:31 IST

विरोधी पक्षांची मागणी : तफावत आढळल्यास सर्व मते तपासा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची येत्या गुरुवारी मतमोजणी करताना मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करण्याआधी व्हीव्हीपॅट पडताळणी केली जावी आणि यात एका जरी मतात तफावत आढळली, तर त्या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदानयंत्रांमधील मतांची व्हीव्हीपॅट पडताळणी करून नंतरच मतमोजणी सुरू केली जावी, अशी मागणी २२ विरोधी पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली.

पुन्हा ‘रालोआ’चे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता वर्तविणारे एक्झिट पोलचे अंदाज व देशाच्या मतदानयंत्रे स्ट्राँगरूममधून अन्यत्र हलविली गेल्याच्या कथित बातम्यांवरून निर्माण झालेले शंकेचे वातावरण, यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांची सकाळी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत रणनीतीची आखणी केली. त्यानंतर, या पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.

आयोगाकडे वरीलप्रमाणे मागणी केल्याचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही सातत्याने आयोगाकडे हीच मागणी करीत आहोत. बुधवारी बैठक घेऊन यावर विचार करू, असे आयोगाने सांगितले. तृणमूलच्या शिष्टमंडळानेही आयोगाची भेटघेऊन भाजपने राज्यात घातलेल्या गोंधळाच्या तक्रारी केल्या.

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, मतदारांनी जो कौल दिला आहे, त्याचा आदर केला जायला हवा. त्यात कोणतीही गडबड होण्याची शक्यता राहू देऊ नये, एवढाच आमचा आग्रह आहे.

सकाळच्या बैठकीत काँग्रेसतर्फे अहमद पटेल, गुलाम नबी आझाद व अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूलचे डेरेक ओ’ब्रायन, सपचे रामगोपाल यादव, द्रमुकच्या कणिमोळी, राजदचे मनोज झा यांच्यासह १९ पक्षांचे नेते सहभागी झाले होते.भाजपला बहुमत अशक्यच : विरोधकविरोधकांच्या बैठकीतही संभाव्य निकाल आणि त्यानंतर उचलावयाची पावले याबाबत चर्चा झाली. बहुसंख्य नेत्यांनी एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे सांगितले, तसेच मतमोजणीच्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भाजप व रालोआला बहुमत मिळणार नाहीत, असा दावा बहुसंख्य नेत्यांनी केला.

ईव्हीएमची वाहतूक आता कशासाठी?शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी संपल्यानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पाठविण्यात आली. तिथे ती बंदिस्त असून, त्या ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात असून, विविध पक्षांचे कार्यकर्तेही तळ ठोकून आहेत.असे असताना उत्तर प्रदेश व बिहारमध्ये गेले दोन दिवस वाहनांतून ईव्हीएमची वाहतूक सुरू होती. त्यापैकी काही ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये नेल्यामुळे या यंत्रांमध्ये काही तरी गडबड असल्याची शंका विरोधी कार्यकर्ते व नेते करीत आहेत.केंद्रातील सत्ताधारी पक्षाला, त्या यंत्रांवर मतदान करून ती नेली असावीत, असा विरोधकांचा संशय आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९