शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतिपदी ! ११ आॅगस्टला होणार शपथविधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 06:15 IST

माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हेच भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील, हे शनिवारी निश्चित झाले. निवडणुकीत नायडू यांनी विरोधकांचे संयुक्त उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हेच भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील, हे शनिवारी निश्चित झाले. निवडणुकीत नायडू यांनी विरोधकांचे संयुक्त उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत १0 आॅगस्ट रोजी संपत आहे. नायडू यांचा शपथविधी ११ आॅगस्ट रोजी होईल. या विजयामुळे भारतात प्रथमच पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही तिन्ही पदे भाजपाकडे आली आहेत.नायडू यांना ५१६, तर गांधी यांना २४४ मते मिळाली. सकाळी १0 वाजल्यापासून संसद भवनात मतदान सुरू झाले. त्यात ७७१ संसद सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ११ मते अवैध ठरली, तर १४ जणांनी मतदान केले नाही. आजारी असलेले केंद्रीय मंत्री विजय गोयल व भाजपाचे सावरलाल जाट, तसेच काँग्रेसच्या मौसम नूर, राणी नराहा, राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, मुस्लीम लीगचे २ तृणमूलचे ४, तसेच पीएमकेचा एक अपक्ष दोन हे मतदान न करणारे खासदार होते. एकूण मतदान ९८.२१ टक्के झाले.लढा दोन विचारप्रवाहांमधील..!मतदानासाठी पंतप्रधान मोदी १0 वाजता संसदेत पोहोचले, तेव्हा तिथे रांग होती. त्यामुळे ते तिथेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्याशी गप्पा मारत थांबले. स्वत: नायडूही लवकरच तिथे पोहोचले. ते म्हणाले की, मी कोणा व्यक्ती वा पक्षाविरुद्ध ही निवडणूक लढवित नाही. अनेक पक्षांचा पाठिंबा असल्याने, मी प्रचारही केलेला नाही. दुसरीकडे गोपाळकृष्ण गांधी म्हणाले की, एनडीएचे उमेदवार नायडू हे अनुभवी नेते आहेत. आमच्या दोघांमध्ये स्पर्धा अजिबात नाही. हा लढा दोन विचारप्रवाहांमधील आहे.