शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतिपदी ! ११ आॅगस्टला होणार शपथविधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 06:15 IST

माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हेच भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील, हे शनिवारी निश्चित झाले. निवडणुकीत नायडू यांनी विरोधकांचे संयुक्त उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हेच भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील, हे शनिवारी निश्चित झाले. निवडणुकीत नायडू यांनी विरोधकांचे संयुक्त उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत १0 आॅगस्ट रोजी संपत आहे. नायडू यांचा शपथविधी ११ आॅगस्ट रोजी होईल. या विजयामुळे भारतात प्रथमच पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही तिन्ही पदे भाजपाकडे आली आहेत.नायडू यांना ५१६, तर गांधी यांना २४४ मते मिळाली. सकाळी १0 वाजल्यापासून संसद भवनात मतदान सुरू झाले. त्यात ७७१ संसद सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ११ मते अवैध ठरली, तर १४ जणांनी मतदान केले नाही. आजारी असलेले केंद्रीय मंत्री विजय गोयल व भाजपाचे सावरलाल जाट, तसेच काँग्रेसच्या मौसम नूर, राणी नराहा, राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, मुस्लीम लीगचे २ तृणमूलचे ४, तसेच पीएमकेचा एक अपक्ष दोन हे मतदान न करणारे खासदार होते. एकूण मतदान ९८.२१ टक्के झाले.लढा दोन विचारप्रवाहांमधील..!मतदानासाठी पंतप्रधान मोदी १0 वाजता संसदेत पोहोचले, तेव्हा तिथे रांग होती. त्यामुळे ते तिथेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्याशी गप्पा मारत थांबले. स्वत: नायडूही लवकरच तिथे पोहोचले. ते म्हणाले की, मी कोणा व्यक्ती वा पक्षाविरुद्ध ही निवडणूक लढवित नाही. अनेक पक्षांचा पाठिंबा असल्याने, मी प्रचारही केलेला नाही. दुसरीकडे गोपाळकृष्ण गांधी म्हणाले की, एनडीएचे उमेदवार नायडू हे अनुभवी नेते आहेत. आमच्या दोघांमध्ये स्पर्धा अजिबात नाही. हा लढा दोन विचारप्रवाहांमधील आहे.