शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतिपदी ! ११ आॅगस्टला होणार शपथविधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 06:15 IST

माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हेच भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील, हे शनिवारी निश्चित झाले. निवडणुकीत नायडू यांनी विरोधकांचे संयुक्त उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हेच भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील, हे शनिवारी निश्चित झाले. निवडणुकीत नायडू यांनी विरोधकांचे संयुक्त उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत १0 आॅगस्ट रोजी संपत आहे. नायडू यांचा शपथविधी ११ आॅगस्ट रोजी होईल. या विजयामुळे भारतात प्रथमच पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही तिन्ही पदे भाजपाकडे आली आहेत.नायडू यांना ५१६, तर गांधी यांना २४४ मते मिळाली. सकाळी १0 वाजल्यापासून संसद भवनात मतदान सुरू झाले. त्यात ७७१ संसद सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ११ मते अवैध ठरली, तर १४ जणांनी मतदान केले नाही. आजारी असलेले केंद्रीय मंत्री विजय गोयल व भाजपाचे सावरलाल जाट, तसेच काँग्रेसच्या मौसम नूर, राणी नराहा, राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, मुस्लीम लीगचे २ तृणमूलचे ४, तसेच पीएमकेचा एक अपक्ष दोन हे मतदान न करणारे खासदार होते. एकूण मतदान ९८.२१ टक्के झाले.लढा दोन विचारप्रवाहांमधील..!मतदानासाठी पंतप्रधान मोदी १0 वाजता संसदेत पोहोचले, तेव्हा तिथे रांग होती. त्यामुळे ते तिथेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्याशी गप्पा मारत थांबले. स्वत: नायडूही लवकरच तिथे पोहोचले. ते म्हणाले की, मी कोणा व्यक्ती वा पक्षाविरुद्ध ही निवडणूक लढवित नाही. अनेक पक्षांचा पाठिंबा असल्याने, मी प्रचारही केलेला नाही. दुसरीकडे गोपाळकृष्ण गांधी म्हणाले की, एनडीएचे उमेदवार नायडू हे अनुभवी नेते आहेत. आमच्या दोघांमध्ये स्पर्धा अजिबात नाही. हा लढा दोन विचारप्रवाहांमधील आहे.