शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विमान अपघातातून नवव्यांदा बचावले व्यंकय्या नायडू

By admin | Updated: March 16, 2017 11:16 IST

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तब्बल नऊ वेळा विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व दुर्घटना गेल्या 14 वर्षात घडल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तब्बल नऊ वेळा विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व दुर्घटना गेल्या 14 वर्षात घडल्या आहेत. बुधवारीदेखील असाच काहीसा प्रकार नायडूंसोबत घडला. व्यंकय्या नायडू आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना इंफाळ येथे घेऊन जाणा-या चार्टर्ड प्लेनमध्ये तांत्रिक दोष आढळून आले. यामुळे दोघांनाही इंफाळ दौ-याची योजना रद्द करावी लागली. 
 
व्यंकय्या आणि शहा मणिपूरचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी रवाना होत होते. मात्र विमानानं उड्डाण भरल्यानंतर 40 मिनिटांनंतर दोघंही पुन्हा दिल्लीत परतले.  नायडू आणि विमान अपघाताचा हा  प्रवास 2003 पासून सुरू झाला आहे. एअर डेक्कनच्या उद्घाटन प्रसंगी विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली होती. यानंतर लँड करताना हेलिकॉप्टर अनेकदा कोसळण्यापासून बचावलेही. शिवाय, नायडूंसोहबत विमान अपघाताच्या घटना नागालँड, मेघालय, झारखंड आणि राजस्थानच्या सिरोमध्येही झाल्या आहेत. बुधवारी जेव्हा त्यांचे विमान दिल्लीकडे परतले तेव्हा, एका व्यक्तीने नायडू यांच्याबरोबर हवाई प्रवास करण्याची कुणामध्ये हिम्मत नसल्याचे म्हटले. पण, यावर शहा यांनी नायडू प्रत्येकवेळी सुरक्षित बचावल्याचे सांगितले.
(मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी बीरेन सिंह)
 
दरम्यान, बुधवारी  भाजपाच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये पहिल्यांदाच स्थापन झालेल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एन. बीरेन सिंह यांचा बुधवारी शपथविधी पार पडला. राजभवनात आयोजित शपथविधी समारंभात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी सिंह यांना शपथ दिली. मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यासोबत भाजपा आणि आघाडीच्या 8 सदस्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार वाय. जॉयकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
शपथविधी समारंभाला भाजपाचे सरचिटणीस राम माधव, आसामचे मंत्री हिमंत बिस्वा सरमासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री ईबोबी हेही उपस्थित होते.  ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेतील ३२ सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.
 
विमानात बिघाड झाल्याने भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. हे दोन्ही नेते ज्या विमानातून प्रवास करीत त्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान माघारी दिल्लीकडे न्यावे लागले.