शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

विमान अपघातातून नवव्यांदा बचावले व्यंकय्या नायडू

By admin | Updated: March 16, 2017 11:16 IST

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तब्बल नऊ वेळा विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व दुर्घटना गेल्या 14 वर्षात घडल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तब्बल नऊ वेळा विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व दुर्घटना गेल्या 14 वर्षात घडल्या आहेत. बुधवारीदेखील असाच काहीसा प्रकार नायडूंसोबत घडला. व्यंकय्या नायडू आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना इंफाळ येथे घेऊन जाणा-या चार्टर्ड प्लेनमध्ये तांत्रिक दोष आढळून आले. यामुळे दोघांनाही इंफाळ दौ-याची योजना रद्द करावी लागली. 
 
व्यंकय्या आणि शहा मणिपूरचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी रवाना होत होते. मात्र विमानानं उड्डाण भरल्यानंतर 40 मिनिटांनंतर दोघंही पुन्हा दिल्लीत परतले.  नायडू आणि विमान अपघाताचा हा  प्रवास 2003 पासून सुरू झाला आहे. एअर डेक्कनच्या उद्घाटन प्रसंगी विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली होती. यानंतर लँड करताना हेलिकॉप्टर अनेकदा कोसळण्यापासून बचावलेही. शिवाय, नायडूंसोहबत विमान अपघाताच्या घटना नागालँड, मेघालय, झारखंड आणि राजस्थानच्या सिरोमध्येही झाल्या आहेत. बुधवारी जेव्हा त्यांचे विमान दिल्लीकडे परतले तेव्हा, एका व्यक्तीने नायडू यांच्याबरोबर हवाई प्रवास करण्याची कुणामध्ये हिम्मत नसल्याचे म्हटले. पण, यावर शहा यांनी नायडू प्रत्येकवेळी सुरक्षित बचावल्याचे सांगितले.
(मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी बीरेन सिंह)
 
दरम्यान, बुधवारी  भाजपाच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये पहिल्यांदाच स्थापन झालेल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एन. बीरेन सिंह यांचा बुधवारी शपथविधी पार पडला. राजभवनात आयोजित शपथविधी समारंभात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी सिंह यांना शपथ दिली. मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यासोबत भाजपा आणि आघाडीच्या 8 सदस्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार वाय. जॉयकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
शपथविधी समारंभाला भाजपाचे सरचिटणीस राम माधव, आसामचे मंत्री हिमंत बिस्वा सरमासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री ईबोबी हेही उपस्थित होते.  ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेतील ३२ सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.
 
विमानात बिघाड झाल्याने भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. हे दोन्ही नेते ज्या विमानातून प्रवास करीत त्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान माघारी दिल्लीकडे न्यावे लागले.