शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

भाज्या, डाळी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पालेभाज्यांसह डाळींच्या भावाची गगनाला गवसणी

By admin | Updated: May 22, 2015 00:32 IST

रमेश शिंदे, औसा : मागील वर्षीच्या कमी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पावसाअभावी भीषण पाणीटंचाई जाणवत असली तरी आता हे कमी पावसाचे लोण आता गोर गरीबांच्या चुलीपर्यंत येऊन ठेपले आहे. पावसाअभावी डाळवर्गीय शेती मालाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले, तर आता पाण्याअभावी भाजीपाला उत्पादनातही मोठी घट झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाज्या आणि डाळी दोन्हींचेही भाव आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

रमेश शिंदे, औसा : मागील वर्षीच्या कमी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पावसाअभावी भीषण पाणीटंचाई जाणवत असली तरी आता हे कमी पावसाचे लोण आता गोर गरीबांच्या चुलीपर्यंत येऊन ठेपले आहे. पावसाअभावी डाळवर्गीय शेती मालाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले, तर आता पाण्याअभावी भाजीपाला उत्पादनातही मोठी घट झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाज्या आणि डाळी दोन्हींचेही भाव आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. औसा तालुका हा तसा खरीप हंगामाचा तालुका असून, तुरीचे उत्पादन तालुक्यात बर्‍यापैकी घेतले जाते. मागील वर्षी खरीप हंगामातील पेरण्यासाठी तब्बल एक महिना उशिराने पाऊस झाला. त्यामुळे तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. १ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी केवळ १६ हजार हेक्टरवरच तुरीचे पीक होते. उडीद, मुगाची तर मागच्या वर्षी अल्प प्रमाणातच पेरणी झाली होती. रबी हंगामासाठी पाऊसच न झाल्याने हरभराही अल्प प्रमाणातच पेरला गेला. त्यामुळे यावर्षी तूर, मूग, उडीद व हरभरा या सर्वच डाळींच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तर पाणीच नसल्यामुळे यावर्षी भाजीपालाही नाही. शेतकर्‍यांकडे शेतीमध्ये जे काही उत्पादन निघेल, त्यामधील काही हिस्सा शेतकरी घरी ठेवत असतो. प्रत्येक वर्षी त्यामुळे शेतकर्‍यांकडे तूर, हरभरा आणि मूग या डाळी घरच्या असतात. पण यावर्षी मात्र या तीनही डाळवर्गीय पिकांचे उत्पादनच नसल्यामुळे आता शेतकर्‍यांच्या घरीही डाळी नाहीत, तर शेतकरी विहिरी, बोअरना असलेल्या पाण्यावर शेतामध्ये भाजीपाल्यांची लागवड करीत. पण विहिरी-बोअर यावर्षी हिवाळ्यातच आटल्यामुळे भाजीपालाही नाही, अशी अवस्था झाल्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तूरडाळीने शंभरी ओलांडली, तर हरभरा, मूग या डाळीही ७० ते ९० रुपये किलो या दरापर्यंत गेल्या आहेत. तर भाजीपालाही २० रुपयांपासून ८० ते १०० रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत.या संदर्भात बोलताना भाजीपाल्याचे कमिशन एजंट व आडते बाळू माळी म्हणााले की, आडतीवरच भाजीपाला येईनासा झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात भाजीपाला घ्यावा कसा आणि विकावा कसा, असा प्रश्न पडला आहे. पण सध्या ज्या शेतकर्‍यांकडे भाजीपाला आहे ते मात्र फायद्यात आहेत, असे सांगितले.