शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

भाज्या, दुधात कीटकनाशके

By admin | Updated: October 3, 2015 03:56 IST

सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे.

नवी दिल्ली : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे. तपासणी झालेल्या २०,६१८ नमुन्यांपैकी १२.५ टक्के नमुन्यांत कीटकनाशकांचे प्रमाण घातक पातळीवर असल्याचे उघड झाले आहे. खाद्यपदार्थांच्या निर्मिती व उत्पादनात आरोग्यवर्धक घटकांची मात्रा, रसायने अथवा कीटकनाशके यांची मात्र तपासण्यासाठी २००५ पासून सरकारतर्फे विविध खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होत आहे. या तपासणीकरिता देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून सरसकट भाज्या, फळे, कडधान्ये, दूध व अन्य खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले जातात व देशभरातील २५ प्रयोगशाळांतून या पदार्थांचा दर्जा व त्यातील रसायने यांची तपासणी केली जाते. त्यावेळी या पदार्थांत कीटकनाशकांची मात्रा अधिक असल्याचे आढळून आले. जमा केलेल्या भाज्यांच्या ११८०, फळांच्या २२५, मसाल्याच्या ७३२, तांदळाच्या ३०, डाळीच्या ४३ नमुन्यांत अशी धोकादायक कीटकनाशके सापडली. भाज्यांमध्ये अ‍ॅसिफेट, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ ही कीटकनाशके सापडली. फळांमध्ये अ‍ॅसिफेट, अ‍ॅसिटामीप्रेड, कार्बो सल्फान, सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफेस आदी सापडले.बंदी असलेल्या अनेक कीटकनाशकांचाही वापर असल्याचे दिसून आले आहे. या नमुन्यात अ‍ॅसिफेट, बाइफ्रेंथिन, अ‍ॅसिटामीप्रेड, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ, मेलेथियन, कार्बो सल्फान, प्रोफेनोफेस, एक्साकोनाजेन आदींचे अंश सापडले. या रसायनांची अतिरिक्त मात्रा शरीरासाठी हानिकारक आहे. तर कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे, की सुमारे ५४३ नमुन्यांत २.६ टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.