शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

भाज्या, दुधात कीटकनाशके

By admin | Updated: October 3, 2015 03:56 IST

सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे.

नवी दिल्ली : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे. तपासणी झालेल्या २०,६१८ नमुन्यांपैकी १२.५ टक्के नमुन्यांत कीटकनाशकांचे प्रमाण घातक पातळीवर असल्याचे उघड झाले आहे. खाद्यपदार्थांच्या निर्मिती व उत्पादनात आरोग्यवर्धक घटकांची मात्रा, रसायने अथवा कीटकनाशके यांची मात्र तपासण्यासाठी २००५ पासून सरकारतर्फे विविध खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होत आहे. या तपासणीकरिता देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून सरसकट भाज्या, फळे, कडधान्ये, दूध व अन्य खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले जातात व देशभरातील २५ प्रयोगशाळांतून या पदार्थांचा दर्जा व त्यातील रसायने यांची तपासणी केली जाते. त्यावेळी या पदार्थांत कीटकनाशकांची मात्रा अधिक असल्याचे आढळून आले. जमा केलेल्या भाज्यांच्या ११८०, फळांच्या २२५, मसाल्याच्या ७३२, तांदळाच्या ३०, डाळीच्या ४३ नमुन्यांत अशी धोकादायक कीटकनाशके सापडली. भाज्यांमध्ये अ‍ॅसिफेट, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ ही कीटकनाशके सापडली. फळांमध्ये अ‍ॅसिफेट, अ‍ॅसिटामीप्रेड, कार्बो सल्फान, सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफेस आदी सापडले.बंदी असलेल्या अनेक कीटकनाशकांचाही वापर असल्याचे दिसून आले आहे. या नमुन्यात अ‍ॅसिफेट, बाइफ्रेंथिन, अ‍ॅसिटामीप्रेड, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ, मेलेथियन, कार्बो सल्फान, प्रोफेनोफेस, एक्साकोनाजेन आदींचे अंश सापडले. या रसायनांची अतिरिक्त मात्रा शरीरासाठी हानिकारक आहे. तर कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे, की सुमारे ५४३ नमुन्यांत २.६ टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.