बेशिस्तीमुळे खोळंबा : रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांची गर्दीवडाळागाव : येथील खंडेराव महाराज चौकापासून थेट माळीगल्ली रस्त्यापर्यंत भरणार्या भाजीबाजाराचा वाहतुकीला अडथळा होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा विक्रे त्यांकडून बेशिस्तपणे हातगाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन संध्याकाळच्या सुमारास नागरिकांना चौकातून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.वडाळागावात गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रस्त्यालगत भाजीबाजार भरत आहे. भाजीबाजाराला महापालिकेकडून स्वतंत्रपणे जागा दिली जात नसल्याने विक्रेत्यांची गैरसोय होत आहे. परिणामी विक्रेत्यांना रस्त्यावरच विक्री करावी लागत असून, वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी विक्रेत्यांची संख्या कमी असताना भाजीबाजाराचा वाहतुकीला अडथळा होत नव्हता; मात्र अलीकडे विक्रे त्यांच्या संख्येत तसेच गावाच्या लोकसंख्येतदेखील वाढ झाली असून, वाहनांचे प्रमाणही वाढल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. खंडोबा चौकापासून थेट राजवाड्यामध्ये जाणार्या रस्त्यापर्यंत भाजीविक्रेते जाऊन पोहचले आहेत. रस्ता अरुंद असून संजरी मार्गावरून वळण घेताना राजवाड्याकडे जाणार्या आंबेडकर चौकात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचप्रमाणे खंडोबा चौकाचा परिसर अरुंद असल्यामुळे येथेही वाहतुकीचा खोळंबा होतो. पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, विक्रे त्यांना सूचना द्याव्यात, त्याचप्रमाणे महापालिकेने वडाळा भाजीबाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. हनुमान मंदिरासमोर भरवावा बाजारवडाळागावातील माळी गल्ली रस्त्यावर भरणारा बाजार सिद्ध हनुमान मंदिरासमोरील मोकळ्या जागेत थेट महापालिकेच्या शाळेकडे जाणार्या रस्त्यापर्यंत विक्रेत्यांना बसण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही. या ठिकाणी रुंद रस्ता व मोकळी जागा असून, वाहतुकीचा मुख्य रस्ताही येथून जात नसल्यामुळे भाजीबाजार सहजरीत्या येथे भरविणे शक्य आहे. महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
भाजीबाजाराचा वाहतुकीला होतोय अडथळा
By admin | Updated: May 27, 2014 00:06 IST