शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भाजीपाला निर्यातीत दीड हजार टनाची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 04:40 IST

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातून यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक ...

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातून यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक हजार टनांनी वाढ झाली आहे. त्यातून ४९.४७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

राज्यातील फळे व भाजीपाल्यास देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पणन मंडळाच्या मार्फत ४४ सुविधा केंदे्र उभारली आहेत. त्या माध्यमातून द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, कांदा, भेंडी, कारले, शेवगा, तोंडली, मिरची यासारख्या भाजीपाल्याची निर्यात करण्यात आली. निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी संस्था, बाजार समित्या, वैयक्तीक शेतकऱ्यांच्या मार्फत ही सुविधा केंद्र चालविली जातात. काही निर्यात केंद्रे पणन मंडळ स्वत: संचालित करते. एप्रिल ते जून २०१८च्या तुलनेत एप्रिल ते जून २०१९ मध्ये तब्बल १५१५.६ टन जादा शेतमालाची निर्यात झाली आहे.

अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, युरोपीयन देश, नेदरलँड, रशिया, थायलंड, कॅनडा, न्यूझीलंड, इंग्लंड, सिंगापूर, चीन, नेपाळ, इराण आणि दुबई या देशांना शेतमाल निर्यात करण्यात आला. त्यात आंबा, द्राक्ष, डाळिंब, केळी, भाजीपाला, फळे, गुलाब फुले, पशुखाद्य आणि कांद्याचा समावेश आहे. तर, परराज्यात बटाटा, गुलाब फुले, कांदा, केळी, डाळिंब, आंबा, कारले, मिरची, दोडका, भेंडी, पालक, हळद अशा विविध प्रकारच्या शेतमालांची विक्री केली आहे. राज्यांतर्गत बाजारपेठेत प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे, दिल्ली, सांगली, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेतमाल पाठविण्यात येतो.शेतकरी झाले निर्यातदारपणन मंडळामार्फत निर्यातपूरक उपक्रमांमधे वाढ व्हावी व युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ‘हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्स’ डिसेंबर २०१५पासून सुरु करण्यात आला आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी, सहकारी संस्था प्रतिनिधी, नवीन उद्योजक यांना निर्यातविषयक प्रशिक्षण दिले जाते. आजतागायत ४६ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून १ हजार १०३ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यातील १०५ जणांनी प्रत्यक्ष निर्यात सुरू केली आहे. तर, १८० प्रशिक्षणार्थींनी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांच्या माध्यमातून कृषी उत्पादनाच्या पुरवठासाखळीची जबाबदारी पार पाडत आहेत.