शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वारी आनंदाचे भांडार

By admin | Updated: July 15, 2015 00:14 IST

वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आहे की पायात आपोआप बळ येते.

वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आहे की पायात आपोआप बळ येते.
या वारीकडे मी आध्यात्मिक विज्ञानाच्या भिंगातून पाहतो. जे इंजिनिअरिंगच्या भौतिक शास्त्रातले सिद्धांत आहेत तेच सिद्धांत संस्कृतमध्ये आहेत. त्याची सांगड असल्याचे कळाल्यापासून वारीला जायची अपार इच्छा होती; पण जमत नसे. आता रिटायर झाल्यावर जमेल तेवढ्या वार्‍या करण्याचा निश्चय केला असल्याचे फडणीस सांगतात. फडणीस यांनी ३५० अभंग आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत. सेवावर्धिनी या स्वयंसेवी संस्थेचे ते काम करतात. वारीमध्ये महिला जास्त ॲडजेस्टमेंट करतात, असे आढळून येते. सरकारने पालखी मार्गावर महिलांसाठी शौचालये उपलब्ध करून द्यावीत, असे वाटते.
वारकर्‍यांनी निर्माण केला स्वच्छतेचा आदर्श
माऊली जेजुरीत : बेलभंडारा उधळत माऊलींचे स्वागत
बाळासाहेब बोचरे - जेजुरी : राज्यातील अस्वच्छतेबद्दल वारकर्‍यांच्या माथी खापर फोडले जात असताना आज सासवडच्या तळावर वारकर्‍यांनी स्वच्छतेचा आगळावेगळा आदर्श निर्माण केला. दरम्यान, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीत दाखल झाली असून, उद्या वाल्हे येथे मुक्कामी जाणार आहे.
वारकरी स्वच्छता पाळत नाहीत, बेशिस्त वागतात असा वारकर्‍यांबद्दलचा अपप्रचार केला जात होता. ते काही अंशी खरे असले तरी वारकर्‍यांना पर्याय उपलब्ध नसल्याने पालखी मार्गावर अस्वच्छता दिसत होती. यावर उपाय म्हणून आळंदीच्या चोपदार फाउंडेशन व पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टने वारकर्‍यांना ५० हजार पिशव्यांचे वाटप केले. आपला कचरा, शिळे अन्न कुठेही न टाकता पिशवीत भरून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार वारकर्‍यांनी कचरा पिशवीत भरून ठेवल्याने पालखी तळावर स्वच्छता दिसून आली. नगरपालिकेचे कर्मचारी सर्व पिशव्या एकत्र करून कचरा डेपोत टाकल्या. त्यामुळे पालखी तळ व परिसरात कुठेही घाण दिसून आली नाही.
अद्याप फक्त नोंदणीकृत दिंड्यांना पिशव्या वाटप करण्यात आल्याने आणि इतर दिंड्यांना पिशव्या नसल्याने काही ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला होता. तथापि अशारितीने अस्वच्छता नियंत्रणात आणू शकतो, हा वेगळा आदर्श आज वारकर्‍यांनी निर्माण केला आहे.
जेजुरीत माऊलींचे भंडारा उधळून स्वागत
सायंकाळी मल्हारगडी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत भंडार्‍याची उधळण करून करण्यात आले. रणरणत्या उन्हात वाटचाल करून आलेले वारकरी मल्हारी मार्तंडाच्या दर्शनासाठी गर्दी करत होते. त्यामुळे आज सोहळा भंडार्‍यात न्हाऊन निघाला होता.