शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

वारी आनंदाचे भांडार

By admin | Updated: July 15, 2015 00:14 IST

वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आहे की पायात आपोआप बळ येते.

वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आहे की पायात आपोआप बळ येते.
या वारीकडे मी आध्यात्मिक विज्ञानाच्या भिंगातून पाहतो. जे इंजिनिअरिंगच्या भौतिक शास्त्रातले सिद्धांत आहेत तेच सिद्धांत संस्कृतमध्ये आहेत. त्याची सांगड असल्याचे कळाल्यापासून वारीला जायची अपार इच्छा होती; पण जमत नसे. आता रिटायर झाल्यावर जमेल तेवढ्या वार्‍या करण्याचा निश्चय केला असल्याचे फडणीस सांगतात. फडणीस यांनी ३५० अभंग आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत. सेवावर्धिनी या स्वयंसेवी संस्थेचे ते काम करतात. वारीमध्ये महिला जास्त ॲडजेस्टमेंट करतात, असे आढळून येते. सरकारने पालखी मार्गावर महिलांसाठी शौचालये उपलब्ध करून द्यावीत, असे वाटते.
वारकर्‍यांनी निर्माण केला स्वच्छतेचा आदर्श
माऊली जेजुरीत : बेलभंडारा उधळत माऊलींचे स्वागत
बाळासाहेब बोचरे - जेजुरी : राज्यातील अस्वच्छतेबद्दल वारकर्‍यांच्या माथी खापर फोडले जात असताना आज सासवडच्या तळावर वारकर्‍यांनी स्वच्छतेचा आगळावेगळा आदर्श निर्माण केला. दरम्यान, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीत दाखल झाली असून, उद्या वाल्हे येथे मुक्कामी जाणार आहे.
वारकरी स्वच्छता पाळत नाहीत, बेशिस्त वागतात असा वारकर्‍यांबद्दलचा अपप्रचार केला जात होता. ते काही अंशी खरे असले तरी वारकर्‍यांना पर्याय उपलब्ध नसल्याने पालखी मार्गावर अस्वच्छता दिसत होती. यावर उपाय म्हणून आळंदीच्या चोपदार फाउंडेशन व पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टने वारकर्‍यांना ५० हजार पिशव्यांचे वाटप केले. आपला कचरा, शिळे अन्न कुठेही न टाकता पिशवीत भरून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार वारकर्‍यांनी कचरा पिशवीत भरून ठेवल्याने पालखी तळावर स्वच्छता दिसून आली. नगरपालिकेचे कर्मचारी सर्व पिशव्या एकत्र करून कचरा डेपोत टाकल्या. त्यामुळे पालखी तळ व परिसरात कुठेही घाण दिसून आली नाही.
अद्याप फक्त नोंदणीकृत दिंड्यांना पिशव्या वाटप करण्यात आल्याने आणि इतर दिंड्यांना पिशव्या नसल्याने काही ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला होता. तथापि अशारितीने अस्वच्छता नियंत्रणात आणू शकतो, हा वेगळा आदर्श आज वारकर्‍यांनी निर्माण केला आहे.
जेजुरीत माऊलींचे भंडारा उधळून स्वागत
सायंकाळी मल्हारगडी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत भंडार्‍याची उधळण करून करण्यात आले. रणरणत्या उन्हात वाटचाल करून आलेले वारकरी मल्हारी मार्तंडाच्या दर्शनासाठी गर्दी करत होते. त्यामुळे आज सोहळा भंडार्‍यात न्हाऊन निघाला होता.