शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

वंदेमातरम् स्पर्धेमुळे देशभक्तीचा भाव जागृत होईल

By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST

प्रवीण दटके : पहिल्या फेरीत तीन शाळांची निवड

प्रवीण दटके : पहिल्या फेरीत तीन शाळांची निवड
नागपूर : वंदेमातरम् हा स्वातंत्र्य लढ्याचा मूलमंत्र असून त्याच्या सामूहिक गायनाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीचा भाव जागृत होईल, असे प्रतिपादन महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी केले. मनपाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक संघाच्या अध्यापक भवन येथे आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे, क्रीडा समितीचे सभापती हरीश दिकांेडवार, शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले, स्पर्धेचे परीक्षक मोरेश्वर निस्ताने, पुरुषोत्तम ताईसकर व अनिता तोटेवार आदी उपस्थित होते.
मनपाच्या शिक्षण विभागामार्फत १९९५ सालापासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती अशोक टालाटुले यांनी प्रास्ताविकातून दिली. ही स्पर्धा तीन गटात विभागली असून पहिल्या गटात वर्ग ९ व १० च्या विद्यार्थ्यांची पहिली फेरी पार पडली. यात २७ शाळांनी सहभाग घेतला. त्यातून विमलताई तिडके विद्यालय, आर.एस. मुंडले, साऊ थ पॉईंट व मनपाची दुर्गानगर येथील माध्यमिक शाळा आदींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या शाळेतील स्पर्धकांनी प्रत्येकी एक देशभक्तीपर गीत सादर केले.
११ ऑगस्टला दुसऱ्या गटातील वर्ग ६ ते ८, १२ तारखेला तिसऱ्या गटातील वर्ग १ ते ५ विद्यार्थ्यांची पहिली फेरी होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी १४ ऑगस्टला होणार असून समारोप १४ ऑगस्टला दुपारी १ वाजता आयएमए हॉल येेथे केला जाईल. यावेळी विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे रवी खंडाईत, देवीदास बतकी, जितेंद्र गायकवाड, राहुल गायकी, संजय भुरे आदी उपस्थित होते. संचालन अरुणा गावंडे यांनी तर आभार विजय इमाने यांनी मानले.(प्रतिनिधी)