शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

'तेव्हा वाजपेयींनी लष्कराला LoC ओलांडण्यापासून रोखले'

By admin | Updated: October 11, 2016 11:58 IST

1999 साली भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आक्रमण करण्याच्या तयारीत होते, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबाव लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लष्काराला रोखले होते.

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि.11 - कारगिल युद्धाच्या वेळी 1999 साली भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आक्रमण करण्याच्या तयारीत होते, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढता दबाव लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लष्काराला रोखले होते, असा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिका यांनी केला आहे. अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी भारतीय जवानांनी सप्टेंबर महिन्यामध्ये पाकव्याप काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक करत त्यांनी लष्कराच्या कारवाईचे समर्थनही केले. सर्जिकल स्ट्राईकनंतर, भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यासाठी देशाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर विनंती करावी लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 
 पाकिस्तान असाच वागत राहिला तर, आम्हाला युद्ध करावे लागेल, असा इशारा पाकिस्तानला देण्याची गरज असल्याचेही मलिक यांनी सांगितले. यावेळी भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधासंदर्भात मलिक यांना प्रश्न विचारण्यात आले, त्यावेळी एक सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान सुधारेल, असे वाटत नाही, आपण त्यांच्या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक तयार राहिले पाहिजे, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागण्यावर भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी टीका केली आहे. देशाच्या सुरक्षेप्रश्नी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिज, तसंच राजकारण्यांना देशाच्या सुरक्षेबाबत ज्ञान नसल्याने त्यांनी बोलणे टाळावे, असे मलिक यांनी सांगितले. 
आणखी बातम्या
यावेळी बोलताना, 1999 सालच्या कारगिल युद्धावेळचे काही अनुभव त्यांनी सांगितले. 2 जून रोजी पाकिस्तानवर आक्रमण करण्यापासून अटलबिहारी वाजपेयींनी रोखल्यामुळे खूप नाराज झालो होतो. पाकिस्तानवर आक्रमण न करण्यासंदर्भात दिवसभरात तीन बैठका घेण्यात आल्यानंतर वाजपेयींनी माझे मन वळवले, अशी माहिती मलिक यांनी दिली. तत्कालीन राष्ट्रीय संरक्षण सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले देखील होते की, 'आम्ही आज नियंत्रण रेषा ओलांडली नाही, मात्र उद्याचे आम्हाला आम्हाला माहित नाही'. भारतावरील आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबाव, त्याकाळी असलेल्या निवडणुका, अशी अनेक कारणे हा निर्णय घेण्यामागे होती. मात्र वाजपेयी यांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता,ते समजते, असे देखील मलिक यांनी मान्य केले.