शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात स्मृती इराणी बनणार मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार !

By admin | Updated: May 25, 2016 01:06 IST

उत्तर प्रदेशात केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावावर मोहर लावली.

- मीना कमल,  लखनौ

उत्तर प्रदेशात केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावावर मोहर लावली. आसाममधील विजयामुळे उत्साह संचारलेल्या भाजपाने उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती बदलण्याचे संकेत दिले आहेत. या राज्यात मुख्य प्रचारक मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून इराणी यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाईल. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासाठी उत्तर प्रदेशातील भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली स्पर्धा पाहता, केंद्रीय नेतृत्वाने कोणताही उमेदवार घोषित न करण्याचा निर्णय घेतला होता. या पदासाठी नाव घोषित केल्यामुळे नव्या वादाला जन्म दिला जाईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. सपा-बसपाच्या रांगेत भाजपा...नोव्हेंबरमध्ये इराणी यांच्या नावाची घोषणा झाल्यास समाजवादी पक्ष आणि बसपानंतर भाजपा मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार घोषित करणारा तिसरा पक्ष ठरणार आहे. भाजपाने या राज्यात यापूर्वी कधीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणला नव्हता. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांच्या रूपाने उमेदवार जनतेसमोर आले आहेत.कल्याणसिंगांच्या नावावर विचारमंथन... उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी जंग छेडली जाताच कल्याणसिंगांच्या नावावर विचारमंथन झाले आहे. पुन्हा राममंदिर मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र मोदींनी लखनौला भेट दिल्यानंतर भाजपाने अचानक आपले डावपेच बदलविले असून दलित अजेंडा जवळ केला आहे.संघाकडून हिरव्या झेंड्याची प्रतीक्षा...मोदींनी इराणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरी, रा.स्व. संघाकडून त्यांच्या नावाला हिरवा झेंडा दिला जाण्याची प्रतीक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये भाजपाकडून इराणी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता पाहता, मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारांच्या शर्यतीत सहभागी नेत्यांना शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्या यांना केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय कळविण्यात आला आहे.