शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

उत्तर प्रदेश आधीच जिंकले, पुढील मतदान ‘बोनस’साठी!

By admin | Updated: March 2, 2017 04:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथील प्रचार सभेत ‘उत्तर प्रदेश जिंकल्याचा’ दावा केला.

महाराजगंज : अत्यंत गरमागरमीच्या राजकीय वातावरणात होत असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन फेऱ्या अद्याप शिल्लक असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथील प्रचार सभेत ‘उत्तर प्रदेश जिंकल्याचा’ दावा केला. राहिलेल्या दोन फेऱ्यांमध्ये आणखी बोनस मिळून भारतीय जनता पार्टी दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल, असा आत्मविवासही त्यांनी व्यक्त केला.सभेतील श्रोत्यांना उद्देशून मोदी म्हणाले की, याआधी झालेल्या मतदानाच्या पाच फेऱ्यांमध्ये मतदारांनी भाजपाला विजयी केले आहे. आता यापुढील सहाव्या व सातव्या फेऱ्यांमध्ये तुम्ही आम्हाला फक्त ‘बोनस’ द्यायचा आहे. गेल्या १५ वर्षांत ज्यांनी उत्तर प्रदेशची लूट केली त्यांना लोक या निवडणुकीत अद्दल घडवतील, असे सांगून मोदी उपरोधाने म्हणाले, मी संपूर्ण भारतात ‘स्वच्छ भारत’ मोहीम सुरु केली. पण उत्तर प्रदेशच्या लोकांनी हे अभियान एका वेगळ््याच पातळीवर नेऊन राज्याच्या राजकारणाचीच सफाई सुरु केली!समाजवादी पक्ष व काँग्रेसची अभद्र युती उत्तर प्रदेशला आणखी खड्ड्यात घालेल, अशी टीका करून मोदी म्हणाले की, यापैकी एका पक्षाला देशाची वाट लावण्याचा तर दुसऱ्या पक्षाला उत्तर प्रदेशची वाट लावण्याचा दांडगा अनुभव आहे. असे दोघे एकत्र आले तर बट्ट्याबोळ नाही तर दुसरे काय होणार? उत्तर प्रदेशमधील जीवन ‘अल्पायुषी व अनिश्चित’ असल्याचे राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरच म्हटल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, याचा अर्थ उत्तर प्रदेशची अवस्था सहारा वाळवंटातील आफ्रीकी देशांसारखी आहे. (वृत्तसंस्था) >आज प्रचार संपणारपूर्व उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत ४९ जागांसाठी चार मार्च रोजी मतदान होत असून तेथील प्रचार गुरुवारी संपेल. मतदानाचा हा सहावा टप्पा असून समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या आझमगढ लोकसभा मतदार संघात या टप्प्यात मतदान होईल. सुमारे १.७२ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. >‘नारियल’ नव्हे ‘नारिंग’काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पूर्व इम्फाळमधील भाषणाची टर उडवत मोदी म्हणाले, काल एका काँग्रेस नेत्याने नारळाचा रस काढून तो लंडनला नेऊन विकण्याची वल्गना केली. नारळ केरळमध्ये पिकतात व लिंबू, संत्रे, मोसंबी यांचा रस काढतात. नारळाचा रस काढल्याचे मी तरी ऐकले नाही. मोदींच्या या भाषणाची काँग्रेसने लगेच दखल घेतली आणि राहुल गांधी ‘नारियल’ नव्हे तर ‘नारिंग’ म्हणाले होते असे सांगून पक्षाने राहुलच्या त्या सभेचा व्हिडिओही प्रसिद्ध केला.>मोदींच्या मांडीवरच जास्त राजकीय पक्षदेवरिया : समाजवादी पक्षाने काँगे्रसला आपल्या मांडीवर बसवले असल्याच्या नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बुधवारी टीका करताना मोदी यांच्याच मांडीवर जास्त पक्ष बसले आहेत, असे म्हटले. मोदी यांची मांडी ही मोठी असल्यामुळे आघाडीतील अनेक पक्षांना बसण्यासाठी तिच्यावर जागा आहे, असे यादव येथील प्रचार सभेत म्हणाले. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने काय केले याचा हिशेब द्यावा, असेही यादव म्हणाले.