शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उत्तर प्रदेश : स्कूल बस- ट्रकची धडक, २५ विद्यार्थी ठार

By admin | Updated: January 19, 2017 12:14 IST

दाट धुक्यामुळे स्कूल बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली.

ऑनलाइन लोकमत
लखनू, दि. १९ - दाट धुक्यामुळे स्कूल बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात  २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. इटा जिल्ह्यातील अलीगंज येथे  आज सकाळ हा अपघात झाला असून सुमारे ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
जे. एस. विद्या शाळेची बस ५० विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. धुक्यामुळे बस चालकाला समोरचा अंदाज आला नाही आणि बस ट्रकवर जाऊन आदळली.  ‘अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे,’ अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली आहे. 
 
उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी पडली असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने दृष्यमानतेतही घट झाली आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र तरीही जे. एस. विद्या शाळा प्रशासनाने शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जर शाळा बंद ठेवली असती तर आजचा हा अपघात टळला असता व त्या निष्पाप मुलांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 
  
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या अपघाताबदद्ल दु:ख व्यक्त केले आहे.