शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

पाणीपुरवठा योजनांसाठी सौर स्टार्टरचा वापर

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

जिल्हा परिषद : घरबसल्या जलकुंभाची माहिती नागपूर : ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा तालुक्यातील चिरवा गावात याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनासाठी याचा वापर करण्याचा प्रस्ताव ...


जिल्हा परिषद : घरबसल्या जलकुंभाची माहिती
नागपूर : ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा तालुक्यातील चिरवा गावात याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनासाठी याचा वापर करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विचाराधीन आहे.
या स्टार्टरच्या माध्यमातून जलकुंभातील पाण्याची पातळी, पुरवठा करण्यात आलेले पाणी याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच जलकुंभात पाणी नसल्यास घरुनच मोटारपंप सुरू करता येईल. यामुळे गावापासून दूर व जंगल भागातील जलस्रोत असलेल्या योजनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास अध्यक्ष निशा सावरकर यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील वीज भारनियमनाचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. परंतु सौरऊर्जेवरील स्टार्टरमुळे वीज प्रवाह सुरू होताच मोटारपंप सुरू करता येईल. यासाठी आर्थिक तरतूद करून जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
दरम्यान पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथ रोगाला आळा घालण्यासाठी मेडीक्लोर औषधाचा घरोघरी पुरवठा करण्यात यावा. ग्रामीण भागात जनजागृती करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पारशिवनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश समितीच्या बैठकीत देण्यात आले.
जलयुक्त शिवर योजना प्रभावीपणे राबविली जावी, यात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जि.प.च्या सिंचन विभागाला करण्यात आल्याची माहिती सावरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)