शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

दाऊदला आणण्यासाठी 'साम-दाम-दंड-भेदा'चा वापर करू - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 12:36 IST

मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी सरकार 'साम,दाम,दंड, भेद'अशा सर्व उपायांचा वापर करेल असे राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.७ - मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्यासाठी सरकार 'साम,दाम,दंड, भेद' अशा सर्व उपायांचा अवलंब करेल, असे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले. भारताचा शत्रू असलेला दाऊदला जेरबंद करण्यासाठी छुप्या प्रयत्नांची शक्यताही नाकारता येत नसल्याचेही राठोड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. 
'गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये वास्तव्य करणा-या दाऊदला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. भारताचे शत्रू कोठेही असले तरी आमचं त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं, ते कोठेही शांतपणे जगू शकणार नाहीत' असे राठोड म्हणाले. ' मात्र आम्ही ( सरकार) शत्रूंवर काय कारवाई करू हे मीडियाला सांगण्यासारखे नाही, ती कारवाई पूर्ण झाल्यानंतर कदाचित तुम्हाला त्याची माहिती देण्यात येईल. भारताविरुद्ध शत्रूत्व घेणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यास हे सरकार कटीबद्ध असल्याचे पुनरुच्चार राठोड यांनी केला.