शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला टंचाई वाढली : कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट

By admin | Updated: May 11, 2015 00:32 IST

औसा : शहरासह तालुक्यात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केलेले बोअरही कोरडे पडू लागले आहेत़ पाण्यावर लाखो रूपये खर्च करूनही प्रतीक्षा करावी लागत आहे़ शहरासह ग्रामीण भागात सध्या बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला आहे तर कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात आहे़

औसा : शहरासह तालुक्यात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केलेले बोअरही कोरडे पडू लागले आहेत़ पाण्यावर लाखो रूपये खर्च करूनही प्रतीक्षा करावी लागत आहे़ शहरासह ग्रामीण भागात सध्या बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला आहे तर कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात आहे़तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ४४ गावांना ८१ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ २ टँकर सुरु असूनही आणखीन १२ टँकरची मागणी करण्यात येत आहे़ अधिग्रहण करण्यात आलेले बोेअर बंद पडत आहेत़ तापमानाने चाळीशी ओलांडल्याने प्रत्येकाच्या घशाला कोरड पडत आहे़ त्यामुळे प्रत्येक जण थंड पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत़ प्रवास करताना प्रत्येक जण रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमधून बाटलीबंद पाण्याची बॉटल विकत घेतात़ दहा रूपयांची बाटली पंधरा ते वीस रूपयांना विकली जात आहे़ कोणी तक्रार केलीच तर परवडली तर घ्या़़़असा प्रश्न केला जातो़ आता ग्रामीण भागातही पंधरा ते वीस लिटरचे जार मागविले जात आहेत़ शहरी भागातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही आता पिण्याचे पाणी जारमधील मागविले जात आहेत़चौकट़़़एका व्यापार्‍याने सांगितले की, फोन केल्यानंतर आठ ते दहा तास पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते़ एकुणच येणारा महिना तालुकावासियांसाठी कसा जाईल याचीच चिंता आता सतावत आहे़ ग्रामीण भागात आठ ते दहा तास वीजपुरवठा उपलब्ध असतो़ त्यामध्येच थंड झालेले पाणी विकावे लागते़ फ्रिज, वीज याचा विचार केला तर १५ ते २० रूपयाला पाणी विकावे लागत असल्याचे सांगण्यात आले़ शहरी भागातही हीच अवस्था आहे़ एका पाणी विक्री करणार्‍या कर्मचार्‍याने सांगितले की मागणी पूर्ण करताना काट्यावरची कसरत करावी लागते़