शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

यूपीत साफसफाई

By admin | Updated: May 21, 2014 01:54 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उत्तरप्रदेशात सुपडासाफ झाल्यानंतर आता राज्यातील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने पक्षांतर्गत सफाई मोहीम हाती घेतली आहे.

लखनौ : लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उत्तरप्रदेशात सुपडासाफ झाल्यानंतर आता राज्यातील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने पक्षांतर्गत सफाई मोहीम हाती घेतली आहे. अपयशामागील कारणे शोधण्यासोबतच कुचकामी ठरलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या हाती नारळ देण्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. या गदारोळात उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीने आपल्या राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या ३६ नेत्यांना बरखास्त केले असून, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास साफ इन्कार केला आहे. राज्यात सपाला फक्त पाच जागा मिळाल्या आहेत. पक्षप्रमुख मुलायमसिंग यादव हे सपाच्या या स्थितीमागील कारणांचे विश्लेषण करीत असल्याचे अखिलेश यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. पक्षातील ज्या नेत्यांना हटविले गेले त्यात प्रामुख्याने नरेंद्र भाटी, सुरेंद्र मोहन अग्रवाल, अनुराधा चौधरी, आशू मलिक, सतीश दीक्षित व मनोज राय यांचा समावेश आहे. याखेरीज अनिस मन्सुरी, मोहंमद अब्बास, इक्बाल अली, हाजी अकरम व कमरुद्दीन हेही आहेत. विद्यार्थ्यांचे माजी नेते राजा चतुर्वेदी व रामसिंग राणा यांनाही बरखास्त केले गेले आहे. सपाच्या कामगिरीकरिता आयोजित बैठकीच्या एक दिवसानंतर या नेत्यांना बरखास्त करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावती यांनी बसपाच्या संघटनात्मक आधार मानल्या जाणार्‍या क्षेत्रीय समन्वयकाच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली. विभाीय समन्वयकांनी नागरिकांच्या खर्‍या कौलाची माहिती दिली नसल्याचे मायावतींचे म्हणणे होते. त्यामुळे या समित्यांवरील अनेक संयोजक हटविण्यात आले आहेत. मायावतींनी देशाच्या विविध भागांतून आलेल्या पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांच्यासोबत स्वत: चर्चा करून पीछेहाटीमागील कारणे जाणून घेतली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी बसपाला २० जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत बसपाला आपले खातेही उघडता आले नाही. (वृत्तसंस्था)