शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

भारावून टाकणारी नेतृत्वशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:19 IST

इंदिराजी असामान्य नेत्या होत्या. देशातील अगदी वरच्या स्तरातील व्यक्तींपासून ते एखाद्या झोपडपट्टीत राहणा-या निराधार वृद्धेपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्धल त्यांना आंतरिक उमाळा होता. १० लाख रुपयांचा कोट घालून मिरवणाºयांना ते कधी कळणार नाही, समजणार नाही.

- उल्हास पवार

(ज्येष्ठ कॉँग्रेस नेते)इंदिराजी असामान्य नेत्या होत्या. देशातील अगदी वरच्या स्तरातील व्यक्तींपासून ते एखाद्या झोपडपट्टीत राहणाºया निराधार वृद्धेपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्धल त्यांना आंतरिक उमाळा होता. १० लाख रुपयांचा कोट घालून मिरवणाºयांना ते कधी कळणार नाही, समजणार नाही.माझ्या कुमार अवस्थेपासून ते आतापर्यंत मला अनेक राजकीय नेते पाहायला मिळाले, त्यांच्याबरोबर वावरायला, काम करायलाही मिळाले. त्या सर्व नेत्यांमध्ये मी आजही इंदिरा गांधी यांना सर्वोच्च स्थान देतो. देशातील अगदी वरच्या स्तरातील वर्तुळापासून ते एखाद्या शहरातील अगदी कोपºयातल्या झोपडपट्टीतील राहणाºया गरीब निराधार वृद्ध महिलेपर्यंत सर्वांच्या मनात इंदिरा गांधी यांनी स्थान मिळवले होते. राजकारणात असे नेतृत्व अगदी दुर्मीळ असते. या प्रेमाबरोबरच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल पराकोटीचा द्वेषही निर्माण झाला, खरे तर केला गेला असेच म्हणावे लागेल. पण त्या अशा कर्तृत्वसंपन्न होत्या की त्यांनी द्वेषाचे रूपांतर प्रेमातच केले.माझा-त्यांचा संपर्क आला तो मी प्रदेश युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर. त्यांनी व संजय गांधी यांनी दिलेला कार्यक्रम त्या वेळी आम्ही इतक्या हिरिरीने राबवला होता की देशात महाराष्ट्राचे नाव झाले होते. त्या वेळच्या युवकांमध्ये एक भारलेले वातावरण तयार झाले. अर्थात याला इंदिराजींचा करिश्माच कारण होता. पण सततचे कार्यक्रम व त्याची माहिती केंद्राला देणे यामुळे तेथे माझे नाव झाले. इंदिराजी मला नावाने ओळखू लागल्या. त्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. पक्षाच्या पदाधिकाºयांना त्या कशा सांभाळत याचा एक अत्यंत चांगला अनुभव माझ्याकडे आहे. मी युवक अध्यक्ष म्हणून त्या वेळच्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला नको होतो. ते मला कायम त्रास देत. त्यांचाही इंदिराजींशी चांगला संपर्क होता, ते महत्त्वाच्या पदावर होते. मी त्याबाबत कधीही संजय गांधी किंवा इंदिरा गांधी यांना सांगितले नव्हते. चांगले काम करत राहायचे इतकेच डोक्यात असायचे. इंदिराजींचा पुणे दौरा आला. मी त्या वेळी बरोबरच होतो, मात्र मला इंदिराजींजवळ जाऊ दिले जात नव्हते. जाताना त्या विमानाच्या शिडीच्या चार पायºया चढून गेल्या. अचानक इंदिराजी मागे वळल्या व वरूनच म्हणाल्या, पवारजी, काम अच्छा चल रहा है, चलने दो. बास!कोणाचे चांगले काम सुरू आहे, याची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा त्यांच्याजवळ होती. ती विश्वासार्ह होती.देशातील दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्दल त्यांना आंतरिक उमाळा होता. हत्तीवरून, पायी प्रवास करीत देशाच्या एका कोपºयात पोहोचून पीडित दलित कुटुंबांच्या पाठीवर हात कोणता नेता ठेवेल? इंदिराजींमध्ये ती धमक होती.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष