शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

भारावून टाकणारी नेतृत्वशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:19 IST

इंदिराजी असामान्य नेत्या होत्या. देशातील अगदी वरच्या स्तरातील व्यक्तींपासून ते एखाद्या झोपडपट्टीत राहणा-या निराधार वृद्धेपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्धल त्यांना आंतरिक उमाळा होता. १० लाख रुपयांचा कोट घालून मिरवणाºयांना ते कधी कळणार नाही, समजणार नाही.

- उल्हास पवार

(ज्येष्ठ कॉँग्रेस नेते)इंदिराजी असामान्य नेत्या होत्या. देशातील अगदी वरच्या स्तरातील व्यक्तींपासून ते एखाद्या झोपडपट्टीत राहणाºया निराधार वृद्धेपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्धल त्यांना आंतरिक उमाळा होता. १० लाख रुपयांचा कोट घालून मिरवणाºयांना ते कधी कळणार नाही, समजणार नाही.माझ्या कुमार अवस्थेपासून ते आतापर्यंत मला अनेक राजकीय नेते पाहायला मिळाले, त्यांच्याबरोबर वावरायला, काम करायलाही मिळाले. त्या सर्व नेत्यांमध्ये मी आजही इंदिरा गांधी यांना सर्वोच्च स्थान देतो. देशातील अगदी वरच्या स्तरातील वर्तुळापासून ते एखाद्या शहरातील अगदी कोपºयातल्या झोपडपट्टीतील राहणाºया गरीब निराधार वृद्ध महिलेपर्यंत सर्वांच्या मनात इंदिरा गांधी यांनी स्थान मिळवले होते. राजकारणात असे नेतृत्व अगदी दुर्मीळ असते. या प्रेमाबरोबरच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल पराकोटीचा द्वेषही निर्माण झाला, खरे तर केला गेला असेच म्हणावे लागेल. पण त्या अशा कर्तृत्वसंपन्न होत्या की त्यांनी द्वेषाचे रूपांतर प्रेमातच केले.माझा-त्यांचा संपर्क आला तो मी प्रदेश युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर. त्यांनी व संजय गांधी यांनी दिलेला कार्यक्रम त्या वेळी आम्ही इतक्या हिरिरीने राबवला होता की देशात महाराष्ट्राचे नाव झाले होते. त्या वेळच्या युवकांमध्ये एक भारलेले वातावरण तयार झाले. अर्थात याला इंदिराजींचा करिश्माच कारण होता. पण सततचे कार्यक्रम व त्याची माहिती केंद्राला देणे यामुळे तेथे माझे नाव झाले. इंदिराजी मला नावाने ओळखू लागल्या. त्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. पक्षाच्या पदाधिकाºयांना त्या कशा सांभाळत याचा एक अत्यंत चांगला अनुभव माझ्याकडे आहे. मी युवक अध्यक्ष म्हणून त्या वेळच्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला नको होतो. ते मला कायम त्रास देत. त्यांचाही इंदिराजींशी चांगला संपर्क होता, ते महत्त्वाच्या पदावर होते. मी त्याबाबत कधीही संजय गांधी किंवा इंदिरा गांधी यांना सांगितले नव्हते. चांगले काम करत राहायचे इतकेच डोक्यात असायचे. इंदिराजींचा पुणे दौरा आला. मी त्या वेळी बरोबरच होतो, मात्र मला इंदिराजींजवळ जाऊ दिले जात नव्हते. जाताना त्या विमानाच्या शिडीच्या चार पायºया चढून गेल्या. अचानक इंदिराजी मागे वळल्या व वरूनच म्हणाल्या, पवारजी, काम अच्छा चल रहा है, चलने दो. बास!कोणाचे चांगले काम सुरू आहे, याची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा त्यांच्याजवळ होती. ती विश्वासार्ह होती.देशातील दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्दल त्यांना आंतरिक उमाळा होता. हत्तीवरून, पायी प्रवास करीत देशाच्या एका कोपºयात पोहोचून पीडित दलित कुटुंबांच्या पाठीवर हात कोणता नेता ठेवेल? इंदिराजींमध्ये ती धमक होती.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष