शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भारावून टाकणारी नेतृत्वशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:19 IST

इंदिराजी असामान्य नेत्या होत्या. देशातील अगदी वरच्या स्तरातील व्यक्तींपासून ते एखाद्या झोपडपट्टीत राहणा-या निराधार वृद्धेपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्धल त्यांना आंतरिक उमाळा होता. १० लाख रुपयांचा कोट घालून मिरवणाºयांना ते कधी कळणार नाही, समजणार नाही.

- उल्हास पवार

(ज्येष्ठ कॉँग्रेस नेते)इंदिराजी असामान्य नेत्या होत्या. देशातील अगदी वरच्या स्तरातील व्यक्तींपासून ते एखाद्या झोपडपट्टीत राहणाºया निराधार वृद्धेपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्धल त्यांना आंतरिक उमाळा होता. १० लाख रुपयांचा कोट घालून मिरवणाºयांना ते कधी कळणार नाही, समजणार नाही.माझ्या कुमार अवस्थेपासून ते आतापर्यंत मला अनेक राजकीय नेते पाहायला मिळाले, त्यांच्याबरोबर वावरायला, काम करायलाही मिळाले. त्या सर्व नेत्यांमध्ये मी आजही इंदिरा गांधी यांना सर्वोच्च स्थान देतो. देशातील अगदी वरच्या स्तरातील वर्तुळापासून ते एखाद्या शहरातील अगदी कोपºयातल्या झोपडपट्टीतील राहणाºया गरीब निराधार वृद्ध महिलेपर्यंत सर्वांच्या मनात इंदिरा गांधी यांनी स्थान मिळवले होते. राजकारणात असे नेतृत्व अगदी दुर्मीळ असते. या प्रेमाबरोबरच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल पराकोटीचा द्वेषही निर्माण झाला, खरे तर केला गेला असेच म्हणावे लागेल. पण त्या अशा कर्तृत्वसंपन्न होत्या की त्यांनी द्वेषाचे रूपांतर प्रेमातच केले.माझा-त्यांचा संपर्क आला तो मी प्रदेश युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर. त्यांनी व संजय गांधी यांनी दिलेला कार्यक्रम त्या वेळी आम्ही इतक्या हिरिरीने राबवला होता की देशात महाराष्ट्राचे नाव झाले होते. त्या वेळच्या युवकांमध्ये एक भारलेले वातावरण तयार झाले. अर्थात याला इंदिराजींचा करिश्माच कारण होता. पण सततचे कार्यक्रम व त्याची माहिती केंद्राला देणे यामुळे तेथे माझे नाव झाले. इंदिराजी मला नावाने ओळखू लागल्या. त्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. पक्षाच्या पदाधिकाºयांना त्या कशा सांभाळत याचा एक अत्यंत चांगला अनुभव माझ्याकडे आहे. मी युवक अध्यक्ष म्हणून त्या वेळच्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला नको होतो. ते मला कायम त्रास देत. त्यांचाही इंदिराजींशी चांगला संपर्क होता, ते महत्त्वाच्या पदावर होते. मी त्याबाबत कधीही संजय गांधी किंवा इंदिरा गांधी यांना सांगितले नव्हते. चांगले काम करत राहायचे इतकेच डोक्यात असायचे. इंदिराजींचा पुणे दौरा आला. मी त्या वेळी बरोबरच होतो, मात्र मला इंदिराजींजवळ जाऊ दिले जात नव्हते. जाताना त्या विमानाच्या शिडीच्या चार पायºया चढून गेल्या. अचानक इंदिराजी मागे वळल्या व वरूनच म्हणाल्या, पवारजी, काम अच्छा चल रहा है, चलने दो. बास!कोणाचे चांगले काम सुरू आहे, याची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा त्यांच्याजवळ होती. ती विश्वासार्ह होती.देशातील दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्दल त्यांना आंतरिक उमाळा होता. हत्तीवरून, पायी प्रवास करीत देशाच्या एका कोपºयात पोहोचून पीडित दलित कुटुंबांच्या पाठीवर हात कोणता नेता ठेवेल? इंदिराजींमध्ये ती धमक होती.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष