शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

UPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं?

By admin | Updated: July 15, 2017 09:17 IST

यूपीए सरकारला आपल्या शेवट्याच्या दिवसांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करायचं होते, असे वृत्त समोर आले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - यूपीए सरकारला आपल्या शेवट्याच्या दिवसांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करायचं होते, असे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. ""टाइम्स नाऊ"" या इंग्रजी वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, भागवत यांना हिंदू दहशतवादाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी यूपीए सरकारमधील मंत्री प्रयत्न करत होते.
 
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी समोर आलेल्या या  खळबळजनक वृत्तामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
अजमेर व मालेगाव बॉम्बस्फोटानंतर यूपीए सरकारनं ""हिंदू दहशतवाद"" असा मुद्दा उपस्थित केला होता. या अंतर्गत यूपीए सरकारला मोहन भागवत यांना जाळ्यात अडकवायचे होते आणि यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेतील बड्या अधिका-यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे. 
 
""टाइम्स नाऊ""नं दिलेल्या वृत्तानुसार, तपास अधिकारी व काही वरिष्ठ अधिकारी अजमेर व अन्य काही बॉम्बस्फोटांमधील तथाकथित भूमिकांसाठी मोहन भागवत यांची चौकशी करणार होते. हे अधिकारी यूपीए सरकारमधील मंत्र्यांच्या आदेशावरुन काम करत होते. चौकशीसाठी या अधिकारी मोहन भागवत यांना ताब्यात घेणार होते, अशी माहिती समोर आली आहे.  
 
फेब्रुवारी 2014 मध्ये ""कारवां"" मॅगझिनमध्ये संशयित दहशतवादी स्वामी असिमानंद यांची मुलाखत छापण्यात आली होती. यात मोहन भागवत यांना कथित स्वरुपात हल्ल्यासाठी प्रमुख प्रेरणा असे म्हणण्यात आले होते. यानंतर यूपीए सरकारनं राष्ट्रीय तपास यंत्रणांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली, मात्र तपास यंत्रणांचे प्रमुख शरद कुमार यांनी यास नकार दिला. मुलाखतीच्या या टेपचा ते फॉरेन्सिक तपास करणार होते, मात्र जेव्हा ही बाब पुढे वाढली नाही तेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हे प्रकरण बंद केले.