शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

UPA सरकारनं दिला अधिकार, NDA सरकार निर्बंध लावणार; वक्फ बोर्डाची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 17:21 IST

वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश आणण्यासाठी केंद्र सरकारकडून वक्फ कायद्यात दुरुस्ती आणणारं विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. मात्र त्यावरून मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - यूपीए सरकारच्या कारकिर्दीत २०१३ मध्ये वक्फ बोर्डाचे अधिकार वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता एनडीए सरकारच्या काळात वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध येऊ शकतात. संसदेत सोमवारी ५ ऑगस्टला मोदी सरकारकडून वक्फ बोर्डाच्या अधिकारांमध्ये दुरुस्ती करणारं विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकानुसार सरकार वक्फ बोर्डाच्या त्या अधिकारावर निर्बंध आणू शकतं ज्यात वक्फ बोर्डाला कुठल्याही संपत्तीवर वक्फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्याचा अधिकार आहे. 

कुठल्याही संपत्तीवर वक्फ बोर्डाची संपत्ती घोषित केल्यानंतर ती संपत्ती पुन्हा घेण्यासाठी जमीन मालकाला वारंवार कोर्टात फेऱ्या माराव्या लागतात. आता कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर वक्फ बोर्डाला कुठल्याही संपत्तीवर सहजपणे दावा करता येणार नाही. शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत वक्फ बोर्डाच्या अधिकारांमध्ये ४० दुरुस्तीवर चर्चा झाली. ही दुरुस्ती करण्याऐवजी नवीन विधेयक आणलं जावं यावरही चर्चा करण्यात आली. नव्या प्रस्तावित विधेयकानुसार वक्फ बोर्डाकडून ज्या संपत्तीवर दावा केला जाईल त्याची आधी पडताळणी केली जाईल. त्याशिवाय वक्फ बोर्डाच्या ज्या वादग्रस्त संपत्ती आहेत त्याच्यावरही पडताळणीसाठी प्रस्ताव आणला जाईल. 

UPA सरकारने वाढवली होती ताकद

विधेयकात केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डात महिलांना प्रतिधिनित्व देण्याचाही प्रस्ताव आहे. २०१३ मध्ये केंद्रातील यूपीए सरकारनं वक्फ कायद्यात दुरुस्ती करत वक्फ बोर्डाला अधिकार दिले होते. त्यानंतर आता या अधिकारांवर निर्बंध आणण्याची तयारी NDA सरकारने केली आहे. त्यामुळे या विधेयकावर संसदेत आणि संसदेबाहेर विरोधकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती?

आता वक्फ बोर्डाकडे जवळपास ९.४ लाख एकरची एकूण ८.७ लाखाहून अधिक संपत्ती आहे. वक्फ अधिनियम १९९५ नुसार, औकाफ म्हणजे अशी संपत्ती जी एक मुस्लीम व्यक्तीकडून धार्मिकरित्या बोर्डाला दान केली जाते. कुठलाही व्यक्ती धर्मासाठी त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला देऊ शकतो परंतु बहुतांश प्रकरणात अशा काही संपत्ती आढळल्या आहेत ज्याच्या खऱ्या मालकांनी ती संपत्ती परत मिळवण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

वास्तविक, राज्य वक्फ बोर्डाला व्यापक अधिकार आहेत आणि अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती वक्फ मालमत्तेवर दावा करते तेव्हा बोर्ड अनेकदा त्याच्या सर्वेक्षणास विलंब करते. तसेच अपील प्रक्रियेत त्रुटी दिसून आल्या आहेत. एखादी व्यक्ती अपील न्यायाधिकरणात वक्फ बोर्डाच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध अपील करू शकते, परंतु अशी अपील निकाली काढण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. 

टॅग्स :Muslimमुस्लीमParliamentसंसद