शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

टू-जी निकालाने यूपीए आनंदात ; अस्वस्थता दूर करण्यास जेटलींचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:07 IST

टू-जी स्पेक्ट्रम खटल्यातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकच्या खासदार कणिमोळी यांच्यासह सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणाºया भाजपाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यास वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर पलटवार केला.

हरिश गुप्ता नवी दिल्ली : टू-जी स्पेक्ट्रम खटल्यातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकच्या खासदार कणिमोळी यांच्यासह सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणाºया भाजपाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यास वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर पलटवार केला.गुरुवारी सकाळी हा निकाल लागताच भाजपाच्या नेत्यांच्या तोंडावर काहीशी अस्वस्थता निश्चितच दिसत होती. तब्बल १.७५ लाख कोटींच्या घोटाळ्यांत ज्यांच्यावर आपण आरोप केले, ते सारेच निर्दोष ठरल्याने ती अस्वस्थता होती. देशात २0१४ साली सत्तांतर होण्याची जी कारणे होती, त्यात टू-जी घोटाळा हेही प्रमुख होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारमधील ए. राजा यांच्यावरच तेव्हा भाजपाने ते आरोप केले होते. पण ही अस्वस्थता फार काळ राहू नये, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. त्यासाठी झालेल्या बैठकीला जेटली यांच्याबरोबरच सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद, मनोज सिन्हा, अमित शहा उपस्थित होते. त्या बैठकीनंतर लगेचच अरुण जेटली यांनी सरकारतर्फे प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेसवर कडाडून टीका केली. या निकालाने काँग्रेसने हुरळून जायचे कारण नाही, न्यायालयाने टू-जी परवाने देताना अप्रामाणिकपणाचा अवलंब झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निर्दोष सुटकेमुळे अभिमान बाळगण्याचे कारण नाही, असे जेटली यांनी काँग्रेसला सुनावले.भाजपा व केंद्र सरकार अस्वस्थ झाले नसले तरी द्रमुकचे नेते या निकालाचा फायदा घेऊन, तेव्हा काँग्रेसने आम्हाला वाºयावर कसे सोडले होते, हे सांगून काँग्रेसलाच अडचणीत आणू शकतील, असे भाजपाला वाटत आहे.राजा यांना ‘क्लीन चिट’-सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या सर्व कथित घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राजा होते. त्यांनी टेलिकॉम परवाने देण्याची प्रचलित पद्धत सोडून मर्जीतील कंपन्यांना परवाने देण्यासाठी नवी पद्धत अनुसरली, हे करत असताना त्यांनी पंतप्रधानांचीही दिशाभूल केली आणि जो कोणी पैसे मोजायला तयार असेल त्याच्याशी सौदेबाजी करून परवाना देण्यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानी समांतर कार्यालय उघडले होते, असा सीबीआयचा आरोप होता. परंतु यापैकी एकाही आरोपात न्यायालयास अजिबात तथ्य आढळले नाही.भाजपाचा खोटेपणा उघड; काँग्रेसची देशव्यापी मोहीम-टू-जी घोटाळाप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसने भाजपा व केंद्र सरकारच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे. याच प्रकरणात भाजपाने काँग्रेस व यूपीए सरकारला बदनाम केले होते. त्यामुळे भाजपाचा खोटेपणा व षड्यंत्र याविरोधात आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, असे काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी सांगितले.ते म्हणाले की, भाजपाच्या खोट्या प्रचारामुळेच अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यांनी लोकपालाची मागणी केली. पण खटल्यात सारेच निर्दोष ठरले. त्यामुळे भाजपाचे आरोप खोटे ठरले. शिवाय अण्णांच्या मागणीला पाठिंबा देणारे नेते आज लोकपालाची नियुक्ती करायला तयार नाहीत, हे सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कॅगचे प्रमुख विनोद राय हेही याच षड्यंत्राचा भाग होते, असाही आरोप आनंद शर्मा यांनी केला.काँग्रेसमध्ये आनंद, ही तर चपराकच-भाजपा नेते काहीही म्हणत असले तरी या निकालामुळे काँग्रेसच्या हातात एक चांगलेच हत्यार मिळाले आहे. भाजपाने केलेले आरोप त्यांच्या सरकारच्या काळातच खोटे असल्याचे सिद्ध झाल्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भ्रष्टाचाराचा ठपका या निकालामुळे पुसून निघाला आहे. या प्रकरणात घोटाळा, गुन्हेगारी स्वरूपाचा कट, कारस्थान असल्याचा एकही पुरावा आपल्याला दिसला नाही, असे न्यायालयाने म्हटल्याने भाजपा व केंद्र सरकारला ही चपराकच आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.आरोपपत्रातील त्रुटी केल्या उघड-अ‍ॅड. विजय अगरवाल यांनी आर. के. चंदोलिया, शाहीद उस्मान बलवा, आसिफ बलवा अणि राजीव अगरवाल या पाच आरोपींच्या वतीने प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी सीबीआयच्या आरोपांना कोणत्याची पुराव्याचा आधार नसल्याचे न्यायालयास पटवून दिले. तसेच आरोपपत्रातील त्रुटी आणि पोकळपणाही उघड केला.हे ठरले निर्दोष-ए. राजा, सिद्धार्थ बेहुरा, आर. के. चांडोलिया, शाहीद उस्मान बलवा, विनोद गोएंका, मे. स्वान टेलिकॉम प्रा. लि., संजय चंद्रा, युनिटेक वायरलेस (तामिळनाडू) लि., गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा, हरी नायर, रिलायन्स टेलिकॉम लि., आसिफ बलवा, राजीव अगरवाल, करीम मोरानी, शरद कुमार, कनिमोळी करुणानिधी.अधिका-यांनी केली दिशाभूल-तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राजा यांनी टेलिकॉम परवाने कसे दिले जात आहेत याविषयी अंधारात ठेवले व त्यांची दिशाभूल केली, हा सीबीआयचा आरोपही न्यायालयाने धादांत बिनबुडाचा असल्याचे नमूद केले. राजा वेळोवेळी पंतप्रधानांना पत्र व टिपणाद्वारे माहिती देत होते. परंतु पंतप्रधान कार्यालयातील अधिका-यांनीच ती पूर्णांशाने डॉ. सिंग यांच्यापुढे न आणता त्यांना अंधारात ठेवले, असा ठपकाही न्यायालयाने ठेवला.

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा