शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

तोपर्यंत 130 आमदार शशिकलांच्या ताब्यात

By admin | Updated: February 8, 2017 17:31 IST

वेगळी चूल मांडण्याचे संकेत देणाऱ्या ओ. पनीरसेल्वम यांनी दिल्यानंतर पक्षाच्या महासचिव शशिकला यांनी आपल्या गटातील 130 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 8 -  जयललिता यांच्या पश्चात सुरू झालेल्या नेतृत्वाच्या लढाईमुळे अण्णा द्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करत वेगळी चूल मांडण्याचे संकेत देणाऱ्या  ओ. पनीरसेल्वम यांनी दिल्यानंतर पक्षाच्या महासचिव शशिकला यांनी आपल्या गटातील 130 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. या आमदारांपैकी कुणी बंडखोरी करून पनिरसेल्वम यांच्या गटात सामील होऊ नये, तसेच राज्यपाल तामिळनाडूत परत येईपर्यंत त्यांचे  समर्थन आपल्यासोबत राहावे, यासाठी शशिकला यांनी ही खबरदारी घेतली आहे.  
आता हे आमदार राज्यपालांकडून शशिकला यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण येण्याची वाट पाहत आहेत. राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण न आल्यास राष्ट्रपतींची भेट घेण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे असेल. दरम्यान आज सकाळी चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात 130 समर्थक आमदारांना संबोधित करताना शशिकला यांनी पनीरसेल्वम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या म्हणाल्या,"राजीनाम्यासंदर्भात पनिरसेल्वम यांनी केलेले आरोप खोटे आहेत. आमदारांच्या रविवारी झालेल्या बैठकीतील निर्णय गुप्त नव्हते. प्रसारमाध्यमांमध्येही त्याचे वृत्त आले होते. तसेच विधिमंडळाच्या नेतेपदी त्यांनीच माझे नाव सुचवले होते." त्याबरोबरच पक्षाची महासचिव या नात्याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चुकांची त्यांना शिक्षा देणे माझे काम होते, असेही त्यांनी सांगितले.  
 जयललिता यांनी ज्या पक्षाविरोधात नेहमी लढा दिला त्या पक्षासोबत पनिरसेल्वम यांनी जवळीक साधल्याचा आरोपही त्यांनी केला. "जयललितांच्या मृत्यूनंतर समर्थकांनी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले होते. पण त्यावेळी मी दु:खात असल्याने असे केले नाही," असेही त्या म्हणाल्या.