शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

तोपर्यंत 130 आमदार शशिकलांच्या ताब्यात

By admin | Updated: February 8, 2017 17:31 IST

वेगळी चूल मांडण्याचे संकेत देणाऱ्या ओ. पनीरसेल्वम यांनी दिल्यानंतर पक्षाच्या महासचिव शशिकला यांनी आपल्या गटातील 130 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 8 -  जयललिता यांच्या पश्चात सुरू झालेल्या नेतृत्वाच्या लढाईमुळे अण्णा द्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करत वेगळी चूल मांडण्याचे संकेत देणाऱ्या  ओ. पनीरसेल्वम यांनी दिल्यानंतर पक्षाच्या महासचिव शशिकला यांनी आपल्या गटातील 130 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. या आमदारांपैकी कुणी बंडखोरी करून पनिरसेल्वम यांच्या गटात सामील होऊ नये, तसेच राज्यपाल तामिळनाडूत परत येईपर्यंत त्यांचे  समर्थन आपल्यासोबत राहावे, यासाठी शशिकला यांनी ही खबरदारी घेतली आहे.  
आता हे आमदार राज्यपालांकडून शशिकला यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण येण्याची वाट पाहत आहेत. राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण न आल्यास राष्ट्रपतींची भेट घेण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे असेल. दरम्यान आज सकाळी चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात 130 समर्थक आमदारांना संबोधित करताना शशिकला यांनी पनीरसेल्वम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या म्हणाल्या,"राजीनाम्यासंदर्भात पनिरसेल्वम यांनी केलेले आरोप खोटे आहेत. आमदारांच्या रविवारी झालेल्या बैठकीतील निर्णय गुप्त नव्हते. प्रसारमाध्यमांमध्येही त्याचे वृत्त आले होते. तसेच विधिमंडळाच्या नेतेपदी त्यांनीच माझे नाव सुचवले होते." त्याबरोबरच पक्षाची महासचिव या नात्याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चुकांची त्यांना शिक्षा देणे माझे काम होते, असेही त्यांनी सांगितले.  
 जयललिता यांनी ज्या पक्षाविरोधात नेहमी लढा दिला त्या पक्षासोबत पनिरसेल्वम यांनी जवळीक साधल्याचा आरोपही त्यांनी केला. "जयललितांच्या मृत्यूनंतर समर्थकांनी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले होते. पण त्यावेळी मी दु:खात असल्याने असे केले नाही," असेही त्या म्हणाल्या.