शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या जागेवर अनारक्षीत प्रवासी रेल्वेतील दांडगाई : वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेसचा खोळंबा

By admin | Updated: December 16, 2015 23:49 IST

जळगाव : कोकणच्या सहलीला जाणार्‍या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने जागेअभावी झालेल्या वादामुळे अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी संतप्त पालकांनी बुधवारी जळगाव स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे या गाडीचा येथे २८ मिनिटे खोळंबा झाला. या विद्यालयाच्या ७० विद्यार्थ्यांचे कोकणात सहलीसाठी अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस या गाडीनेआरक्षण ...



जळगाव : कोकणच्या सहलीला जाणार्‍या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने जागेअभावी झालेल्या वादामुळे अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी संतप्त पालकांनी बुधवारी जळगाव स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे या गाडीचा येथे २८ मिनिटे खोळंबा झाला.
या विद्यालयाच्या ७० विद्यार्थ्यांचे कोकणात सहलीसाठी अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस या गाडीनेआरक्षण होते. असे असले तरी या गाडीत विद्यार्थ्यांच्या आरक्षित आसनांवर दुसरेच प्रवासी बसलेले होते. विद्यार्थ्यांना गाडीत चढण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. या मुळे पालक संतप्त झाले. विद्यार्थ्यांना गाडीत प्रवेशच करता येत नसल्याने पालकांनी साखळी ओढून गाडी थांबवली. तरीदेखील जागा बळकावून बसलेले अनारक्षीत प्रवासी हलायला तयार नसल्याने तब्बल चार वेळा साखळी खेचून गाडी थांबवली गेली. विद्यार्थी कसेबसे गाडीत चढले मात्र त्यांना बसायला जागा मिळालीच नाही. रेल्वे सुरक्षा बलाने गाडी अखेर तशीच रवाना केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने मनमाड स्थानकावर संपर्क साधून तेथे विद्यार्थ्यांना जागा करून देणाच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे गाडीला जळगाव स्टेशनवर २८ मिनिटे विलंब झाला.