शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अनोखी परंपरा: येथे रोपट्याशी होतो प्रत्येक मुलीचा विवाह

By admin | Updated: March 25, 2017 00:23 IST

परंपरा अनोखी आहे आणि मनाला भावणारीही. या परंपरेत संस्कार आहे आणि करारही. संस्कार निसर्गाप्रती आदराचा, तर करार पर्यावरणाच्या संरक्षणाचा.

रांची : परंपरा अनोखी आहे आणि मनाला भावणारीही. या परंपरेत संस्कार आहे आणि करारही. संस्कार निसर्गाप्रती आदराचा, तर करार पर्यावरणाच्या संरक्षणाचा. कधी ऐकलीय का तुम्ही... गोष्ट मुलींचा रोपट्याशी विवाह लावण्याची. ऐकली नसेल तर मग ऐका, येथे प्रत्येक घरातील मुलींचा रोपट्याशी विवाह होतो आणि तोही धूमधडाक्यात, गावातील पंचाच्या समक्ष. नववधू रोपट्याला तीन वेळा कुंकू लावून त्याला तीन प्रदक्षिणा घालतात. या विवाहाचे अख्खे गाव साक्षीदार बनते. ही मुलेही ज्या रोपट्याशी विवाह झाला आहे, त्याचे फळ आयुष्यात कधीही खात नाही, तसेच त्याची फांदीही तोडत नाही. एवढेच नाही तर वधू आणि तिच्या घरचे लोक या जावई रोपट्याची जीवनभर देखभाल करण्याची जबाबदारी घेतात. आहे ना अनोखी परंपरा. झारखंडचे संताल आदिवासी आजही या परंपरेचे तेवढ्याच आत्मीयतेने पालन करतात, जेवढे ते आधी करीत होते. संताली समुदायात या विवाहाला ‘मातकोम बापला’ म्हणतात. मातकोम म्हणजे मोहाचे झाड आणि बापला म्हणजे विवाह. मुलाशी विवाह होण्याच्या तीन तास आधी रोपट्याशी विवाहाची ही परंपरा पाळली जाते. हा विवाहही खऱ्या विवाहासारखाच असतो. मूळ विवाहाप्रमाणेच सर्व विधी केले जातात. या विवाहासाठी वधूला पिवळ्या रंगाची साडी नेसवली जाते. गावचे लोक पारंपरिक वाद्य वाजवीत घरातील महिलांसह तिची रोपट्यापर्यंत वरात काढतात. रोपट्याजवळ आल्यानंतर वधूची वहिनी प्रथेप्रमाणे रोपट्याला सुताचा दोरा बांधते. त्यानंतर नववधू रोपट्याला कुुंकू लावून त्याला तीन प्रदक्षिणा घालते. प्रदक्षिणेनंतर रोपट्याशी विवाहाचा विधी पूर्ण होतो. ग्रामीण भागात या परंपरेमुळे पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होते. कारण प्रत्येक घर कोणत्या ना कोणत्या झाडाची काळजी घेत असते. रोपट्याशी विवाहामुळे त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. रोपट्याला हिरवेगार ठेवण्यासह त्याचे नुकसान होऊ नये, यासाठी वधूचे कुटुंबीय दक्ष राहातात.