शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत यापुढे मोबाइलवर बंदी

By admin | Updated: October 22, 2016 14:27 IST

शत्रू देशांकडून सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाने यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइल फोन वापरावर बंदी घातली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 - शत्रू देशांकडून सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाने यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइल फोन वापरावर बंदी घातली आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीनकडून सायबर हल्ल्यांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.  याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाच्या मुद्यांवर घेण्यात आलेले निर्णय तसेच धोरणासंबंधी अतिसंवेदनशील माहिती बाहेर फुटू नये, यासाठी खबरदारीच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईल फोन बंदीसंदर्भात अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्रीय सचिवालयाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. 'केंद्रीय मंत्रिमंडळच्या कोणत्याही बैठकीत स्मार्ट फोन, मोबाइल फोन वापरण्यावर परवानगी नाकारण्यात आली असून, यासंबंधी प्रत्येक मंत्र्यांना त्यांच्या खासगी सचिवांनी पंतप्रधान कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाची योग्य ती माहिती द्यावी', असे केंद्रीय सचिवालयाने या परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
 
आणखी बातम्या
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्जिकल स्ट्राईकमुळे बिथरलेला पाकिस्तान आता स्मार्ट फोन, मोबाईल फोनसारख्या यंत्रामधील डेटा हॅक करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. यासाठी सतर्कता म्हणून अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील विभागात काम करणा-या कर्मचा-यांनाही त्यांचे मोबाईल फोन ऑफिसमधील कॅम्प्युटर आणि लॅपटॉपला जोडू नये, असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत.  तसेच पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय या भागातही स्मार्टफोनवर वापरावर बंदी घातली गेली आहे.