शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपात फेरबदलाचे वारे

By admin | Updated: December 31, 2015 00:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करू इच्छितात. भाजपाच्या पक्ष संघटनेचा चेहरामोहरा बदलण्याचाही त्यांचा इरादा आहे. तथापि, आपल्या विकास अजेंड्याला अनुरूप

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करू इच्छितात. भाजपाच्या पक्ष संघटनेचा चेहरामोहरा बदलण्याचाही त्यांचा इरादा आहे. तथापि, आपल्या विकास अजेंड्याला अनुरूप कामगिरी आश्वासकपणे बजावू शकतील, असे नवे चेहरे शोधणे अद्याप शक्य झालेले नाही, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बिहार निवडणुकीतील दारुण पराभवानंतरच या प्रक्रियेला त्यांनी प्रारंभ केला असून, मकर संक्रांतीनंतर सरकार व संघटनेत काही खास फेरबदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.देशातील बेरोजगारी दूर करण्याचे व विकासाच्या नव्या योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन देत, मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. येत्या मे महिन्यात सरकारची दोन वर्षे पूर्ण होतील. तथापि, जनतेला अप्रूप वाटावे, अशी भव्य कामगिरी सरकारला अद्यापपावेतो काही करून दाखवता आलेली नाही. काही आक्रमक कट्टरपंथियांमुळे पक्ष संघटनेलाही विरोधकांचे हल्ले सहन करावे लागले. या पार्श्वभूमीवर सरकार व संघटनेची प्रतिमा लवकरात लवकर सुधारावी, असा संकल्प मोदींच्या मनात आहे. भाजपा अध्यक्षपदाची अमित शाह यांची मुदतही जानेवारी महिन्यात संपत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर त्यांची पुन्हा निवड होते की नाही, याविषयीदेखील तर्कवितर्क केले जात आहेत. या दोन्हींतून येत्या मकर संक्रांतीनंतर मार्ग निघू शकतो, अशी सूत्रांची अपेक्षा आहे.मोदी मंत्रिमंडळात सध्या ६६ मंत्री आहेत. त्यात उत्तरप्रदेशातील १३, बिहारचे ८ व महाराष्ट्रातले ७ मंत्री आहेत. मंत्रिमंडळात वकील, डॉक्टर, इंजिनीअर, चार्टर्ड अकाउंटंट, अर्थतज्ज्ञ असे ३४ जण आहेत. मंत्रिमंडळात ८ महिलांचाही समावेश आहे. मे २0१४ मध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यानंतर, नोव्हेंबर २0१४ मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले सुरेश प्रभू व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा समावेश करून, मोदींनी त्यांच्याकडे अनुक्रमे रेल्वे व संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या फेरबदलात मोदी अरुण जेटलींकडे पुन्हा संरक्षण खाते सोपवू इच्छितात. मात्र, अर्थ खात्यासाठी सुयोग्य व्यक्तीचा शोध अजून संपलेला नाही. वादग्रस्त विधाने करून, सरकारला अडचणीत आणणाऱ्या गिरीराजसिंग व निरंजन ज्योतींची मंत्रिमंडळातून गच्छंती होऊ शकते.२0१६ साली देशातल्या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात आसाम वगळता अन्य राज्यात भाजपला फारसे भवितव्य नाही. २0१७ साली उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आदी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाजपचे सारे लक्ष सध्या केंद्रित आहे. त्यापूर्वी पक्षाची व केंद्र्र सरकारची इमेज बदलण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. जानेवारी महिन्यात भाजप व संघपरिवाराची या संदर्भात चर्चा होऊ शकते. मकर संक्रांतीनंतर मंत्रिमंडळात व संघटनेत काही महत्त्वाचे फेरबदल होऊ शकतील, अशी शक्यता आहे.