शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या उद्धटपणाचा निर्विवाद पराभव!

By admin | Updated: March 12, 2017 00:46 IST

गोव्यात मतदारांनी उद्धट भाजपाचा पराभव केला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सात सहकाऱ्यांना मतदारांनी घरचा

- राजू नायक गोव्यात मतदारांनी उद्धट भाजपाचा पराभव केला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सात सहकाऱ्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. २१वरून या पक्षाला १३वर आणले. त्याला कारणे त्या पक्षाच्या नेत्यांच्या अनेक चुका, वचनांना फासलेला हरताळ, प्रशासनाचा खेळखंडोबा आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेसवरही मात करण्याचा प्रयत्न ही आहेत. आणि काँग्रेसने १७ जागा प्राप्त केलेल्या आहेत. ते जरी पूर्ण बहुमत मिळवू शकले नसले तरी त्यांना सर्वांत मोठा पक्ष म्हणून लोकांनी निवडून आणलेले आहे. त्यामुळे भाजपाने आता मतदारांच्या कौलाचा मान राखून विरोधी बाकांवर बसणे शहाणपणाचे ठरेल. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजूनही भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे मांडे खात आहेत. ज्याचा पुन्हा मतदारांच्या भावनांना तुच्छ लेखून उद्धटपणाने मताधिक्याची तोडफोड केल्याचा अर्थ घेतला जाईल.लक्षात घेतले पाहिजे, की २०१२मध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेल्या भाजपाने अस्तित्वरक्षण करण्याबरोबर भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु काही लोकानुरंजक कार्यक्रम राबविले व करोडो रुपयांच्या खिरापती वाटल्या की लोक मिंधे बनतील असे नेत्यांना वाटले. शेवटपर्यंत महिलांना खिरापती वाटल्याने त्याही आपल्यालाच मते देतील, असे भाजपा नेते निर्लज्जपणे सांगत होते; परंतु उद्धटपणापुढे खिरापती टिकणार नाहीत हाच धडा मतदार आणि महिलांनीही भाजपाला दिलाय. किंबहुना ख्रिस्ती मतदारांनी त्या वेळी भाजपाच्या पारड्यात भरभरून मते टाकण्याचे कारणही तेच होते. परंतु, ख्रिस्ती मतदारांनी या वेळी भाजपाचा तिरस्कार केला असे म्हटले असले तरी जिंकून आलेल्यांमध्ये १३पैकी ७ जण ख्रिस्ती आमदार आहेत. म्हणजे ख्रिश्चन समाज या पक्षाशी अगदीच फटकून वागलेला नाही. त्या भावनेचा या भगव्या पक्षाने आता मान ठेवणे आवश्यक बनले आहे. तसे न घडल्यास हे आमदार अस्वस्थ बनतील आणि नजीकच्या काळात भाजपाला भगदाडही पडू शकते. त्यामुळेच गोव्यात बहुसंख्य ख्रिस्ती आमदार असलेल्या या पक्षाला आपली ध्येयधोरणे आणि पक्षाचे कार्यक्रम आखताना आता अल्पसंख्याकांविषयी आदरभाव ही भावनाही बाळगावी लागेल. काँग्रेस पक्षापुढे आता महत्त्वाची जबाबदारी आहे. या पक्षाने खूप मोठी कामगिरी बजावली होती म्हणून त्यांना लोकांनी या वेळी निवडलेय असे नव्हे, तर लोकांना भाजपाचा पराभव करायचा होता. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांना उतरणे ही काँग्रेस पक्षाची पहिली जबाबदारी राहील. त्या पक्षाने आपले नैसर्गिक व विश्वासार्ह सहकारी म्हणून ‘गोवा फॉरवर्ड’कडे व रोहन खंवटे यांच्यासारख्या अपक्षांकडे मदत मागणे योग्य ठरेल. त्यासाठी दिगंबर कामत यांच्यासारख्या अनुभवी व सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकणाऱ्यांना नेतेपदी निवडावे लागेल. केंद्रात उचापतखोर पक्ष सत्तेवर असल्याने तर त्यांना सरकार स्थिर तसेच कार्यक्षम ठेवण्यात सारी राजकीय अक्कलहुशारी व कौशल्य पणाला लावावे लागेल. एकूण ही विधानसभा त्रिशंकूच आहे आणि अशा परिस्थितीत सरकारे अस्थिर बनणे स्वाभाविक मानले जाते. त्यावर काँग्रेस कशी मात करते व आपली विश्वासार्हता कशी टिकविते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.