शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

'नो बॉल' दिला म्हणून अंपायरच्या बहिणीला विष पाजून मारले

By admin | Updated: May 31, 2016 09:10 IST

क्रिकेट सामन्या दरम्यान पंचांच्या निर्णयावरुन अनेकदा वादविवाद होतात. महत्वाच्याक्षणी पंचांचा एखादा चुकीचा निर्णय संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकतो.

ऑनलाइन लोकमत 

अलीगड, दि. ३१ - क्रिकेट सामन्या दरम्यान पंचांच्या निर्णयावरुन अनेकदा वादविवाद होतात. महत्वाच्याक्षणी पंचांचा एखादा चुकीचा निर्णय संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकतो. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट संघटनांच्या कठोर नियमांमुळे खेळाडू एखाद्यावेळी पंचांशी निर्णयावरुन हुज्जत घालतात पण त्यापलीकडे हे वाद वाढत नाहीत. स्थानिक क्रिकेट स्तरावर मात्र असे कुठलेही नियम नसल्यामुळे पंचांच्या निर्णयावरुन होणारे वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचतात. 
 
उत्तरप्रदेशातील अलिगडमधील जारारा गावामध्ये पंचाचा निर्णय न पटल्यामुळे तरुणीला विष पाजून ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जरारा हे अलीगडपासून वीस कि.मी. अंतरावर असलेले छोटेसे गाव. या गावामध्ये आयपीएलच्या धर्तीवर १४ मे पासून जरारा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरु झाली होती. 
 
३० मे रोजी अंतिम सामना होता. २७ मे पर्यंत स्पर्धा सुरळीत सुरु होती. २८ मे रोजी जरारा आणि बारीकी संघां दरम्यानच्या सामन्यात पंच राजकुमार यांनी महत्वाच्या क्षणी गोलंदाजाने टाकलेला चेंडू नो बॉल दिला. पंचाचा हा निर्णय संदीप पालला पटला नाही. त्याने निर्णयावरुन पंच राजकुमार यांच्याशी हुज्जत घातली व आपला निर्णय बदलण्यास सांगितले. पण पंच राजकुमार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. 
 
त्यामुळे चिडलेल्या संदीपने पंचाला तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील, तुझ्या कुटुंबातील एका सदस्याला जीव गमवावा लागेल अशी धमकी दिली. पश्चिम उत्तरप्रदेशात क्रीडा स्पर्धां दरम्यान अशा हिंसाचाराच्या घटना सामान्य समजल्या जातात. २९ मे ला दुस-याचा दिवशी संदीप पालने शेतावर जाणा-या राजकुमारच्या बहिणीला गाठले. 
 
राज कुमारचे कुटुंबिय कुठल्यावेळेला शेतात जातात हे त्याला चांगले ठाऊक होते. राजकुमारची १५ वर्षांची बहिण पूजा आणि तिच्यासोबत असलेल्या तीन मैत्रिणींना संदीप पालने विष मिसळलेले कोल्डड्रीक पाजले. पूजा संदीपला ओळखत असल्यामुळे तिला कुठलाही संशय आला नाही. ती विश्वासाने ते कोल्ड्रींग प्यायली. 
 
पण कोल्ड्रींग प्याल्यानंतर पूजा आणि तिच्या मैत्रिणी तिथेच कोसळल्या. या घटनेत पूजाचा मृत्यू झाला. तिघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जरारा गावचे प्रधान रतन पाल रावल या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, मी सुरुवातीपासून या स्पर्धेला विरोध केला होता. या लोकांना स्पोटर्समनशिप म्हणजे काय ते समजत नाही. स्पर्धा आयोजित करु नये असे माझे सुरुवातीपासून मत होते अखेर माझी भिती खरी ठरली.