शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

'नो बॉल' दिला म्हणून अंपायरच्या बहिणीला विष पाजून मारले

By admin | Updated: May 31, 2016 09:10 IST

क्रिकेट सामन्या दरम्यान पंचांच्या निर्णयावरुन अनेकदा वादविवाद होतात. महत्वाच्याक्षणी पंचांचा एखादा चुकीचा निर्णय संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकतो.

ऑनलाइन लोकमत 

अलीगड, दि. ३१ - क्रिकेट सामन्या दरम्यान पंचांच्या निर्णयावरुन अनेकदा वादविवाद होतात. महत्वाच्याक्षणी पंचांचा एखादा चुकीचा निर्णय संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकतो. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट संघटनांच्या कठोर नियमांमुळे खेळाडू एखाद्यावेळी पंचांशी निर्णयावरुन हुज्जत घालतात पण त्यापलीकडे हे वाद वाढत नाहीत. स्थानिक क्रिकेट स्तरावर मात्र असे कुठलेही नियम नसल्यामुळे पंचांच्या निर्णयावरुन होणारे वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचतात. 
 
उत्तरप्रदेशातील अलिगडमधील जारारा गावामध्ये पंचाचा निर्णय न पटल्यामुळे तरुणीला विष पाजून ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जरारा हे अलीगडपासून वीस कि.मी. अंतरावर असलेले छोटेसे गाव. या गावामध्ये आयपीएलच्या धर्तीवर १४ मे पासून जरारा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरु झाली होती. 
 
३० मे रोजी अंतिम सामना होता. २७ मे पर्यंत स्पर्धा सुरळीत सुरु होती. २८ मे रोजी जरारा आणि बारीकी संघां दरम्यानच्या सामन्यात पंच राजकुमार यांनी महत्वाच्या क्षणी गोलंदाजाने टाकलेला चेंडू नो बॉल दिला. पंचाचा हा निर्णय संदीप पालला पटला नाही. त्याने निर्णयावरुन पंच राजकुमार यांच्याशी हुज्जत घातली व आपला निर्णय बदलण्यास सांगितले. पण पंच राजकुमार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. 
 
त्यामुळे चिडलेल्या संदीपने पंचाला तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील, तुझ्या कुटुंबातील एका सदस्याला जीव गमवावा लागेल अशी धमकी दिली. पश्चिम उत्तरप्रदेशात क्रीडा स्पर्धां दरम्यान अशा हिंसाचाराच्या घटना सामान्य समजल्या जातात. २९ मे ला दुस-याचा दिवशी संदीप पालने शेतावर जाणा-या राजकुमारच्या बहिणीला गाठले. 
 
राज कुमारचे कुटुंबिय कुठल्यावेळेला शेतात जातात हे त्याला चांगले ठाऊक होते. राजकुमारची १५ वर्षांची बहिण पूजा आणि तिच्यासोबत असलेल्या तीन मैत्रिणींना संदीप पालने विष मिसळलेले कोल्डड्रीक पाजले. पूजा संदीपला ओळखत असल्यामुळे तिला कुठलाही संशय आला नाही. ती विश्वासाने ते कोल्ड्रींग प्यायली. 
 
पण कोल्ड्रींग प्याल्यानंतर पूजा आणि तिच्या मैत्रिणी तिथेच कोसळल्या. या घटनेत पूजाचा मृत्यू झाला. तिघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जरारा गावचे प्रधान रतन पाल रावल या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, मी सुरुवातीपासून या स्पर्धेला विरोध केला होता. या लोकांना स्पोटर्समनशिप म्हणजे काय ते समजत नाही. स्पर्धा आयोजित करु नये असे माझे सुरुवातीपासून मत होते अखेर माझी भिती खरी ठरली.