शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेवटी सत्याचाच विजय होईल - केजरीवाल

By admin | Updated: May 8, 2017 22:35 IST

लाचखोरी प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर मौन सोडले आहे. काही झाले तरी अखेर सत्याचाच विजय होईल

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8 - कपिल मिश्रा यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाबाबत अखेर आपले मौन सोडले आहे. गेले दोन दिवस सुरू असलेली आरोपांची मालिका आणि आज संध्याकाळी कपिल मिश्रा यांचे पक्षातून निलंबन झाल्यानंतर केजरीवाल यांनी या प्रकरणावर प्रथमच भाष्य करताना शेवटी सत्याचाच विजय होईल, उद्या होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनापासून त्याची सुरुवात होईल, असे ट्विट केले आहे. 

 केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी केला होता. या आरोपामुळे आधीच अंतर्गत वादविवादांनी पोखरलेल्या आपमध्ये मतभेद अधिकच तीव्र झाले होते. दरम्यान, आज संघ्याकाळी आपच्या संसदीय समितीने कपिल मिश्रांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचे पक्षातून निलंबन केले होते.  दरम्यान, सत्येंद्र मिश्रा यांनीही मिश्रा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.

 

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी आरोप सरकारमधील बरखास्त करण्यात आलेले मंत्री कपिल मिश्रा यांनी रविवारी केला होता. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हे आरोप फेटाळले असले, तरी या मुद्द्यावरून भाजपा व इतर पक्ष आक्रमक झाले. केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

मिश्रा यांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पत्रकारांशी बोलताना मिश्रा म्हणाले की, ‘जैन यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी केजरीवाल यांना नगदी दोन कोटी रुपये देताना आपण बघितले. आपण याबाबत केजरीवाल यांना विचारणा केली असता, ते म्हणाले होते की, ‘राजकारणात अशा गोष्टी होत असतात.’ जैन यांनी आपल्याला असे सांगितले होते की, त्यांनी केजरीवाल यांच्या नातेवाईकांचा ५० कोटींचा जमिनीचा एक व्यवहार केला आहे. याबाबतही आपण केजरीवाल यांना विचारणा केली असता, हे सर्व खोटे असल्याचे सांगत, आपल्यावर विश्वास ठेवा, असे ते म्हणाले.’