शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

पाकिस्तानात अडकलेली उज्मा मायदेशी परतली, सुषमा स्वराजांनी केलं स्वागत

By admin | Updated: May 25, 2017 11:49 IST

पाकिस्तानात बंदुकीचा धाक दाखवून उज्माला लग्नास भाग पाडण्यात आलं होतं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - पाकिस्तानात अडकलेली भारतीय महिला उज्मा मायदेशी भारतात परतली आहे. पाकिस्तानात बंदुकीचा धाक दाखवून तिला लग्नास भाग पाडण्यात आलं होतं. बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्माला मायदेशी परतण्याची परवानगी दिली होती, तसेच पोलिसांना तिला वाघा सीमेपर्यंत सोडण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानी नागरिक ताहिर अलीने बळजबरीने तिच्याशी लग्न केले होते. मायदेशी परतू दिले जात नसल्यामुळे उज्माने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेतला होता.
 
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उज्माचे स्वागत केलं असून आतापर्यंत ज्या त्रासाला सामोरं जाव लागलं त्यासाठी माफीही मागितली आहे. 
 
उज्माने १२ मे रोजी न्यायालयात याचिका केली होती. माझी पहिल्या विवाहापासून झालेली मुलगी भारतात थॅलीसीमियाने आजारी असल्यामुळे मला मायदेशी जाण्याची मुभा द्यावी, अशी विनंती तिने याचिकेत केली होती. अलीनेही याचिका करून मला माझ्या पत्नीची भेट घेऊ द्यावी, अशी विनंती केली होती.
 
न्यायमूर्ती मोहसीन अख्तर कयानी यांनी बुधवारी दोन्ही याचिकांवर सुनावणी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी उजमाला मायदेशी परतण्याची मुभा दिली. न्यायालयाने उज्माची व्हिसा कागदपत्रे तिला परत केली. ही कागदपत्रे अलीने घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याने ती न्यायालयाच्या स्वाधीन केली. 
 
उज्माला भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या वाघा बॉर्डरवर सोडा, असे आदेश न्यायमूर्तींनी पोलिसांना दिले होते. तू चेंबरमध्ये अलीला भेटू इच्छिेतस का, अशी विचारणा न्यायमूर्तींनी उज्मानकडे केली; मात्र तिने स्पष्ट शब्दांत नकार दिला. मी केवळ दोन मिनिटांसाठी तिला भेटू इच्छित होतो; मात्र मला मुभा दिली गेली नाही, अशी तक्रार अलीने केली. उज्मा सुनावणीदरम्यान न्यायालयात बेशुद्ध झाल्यामुळे डॉक्टरांना बोलवावे लागले होते.
 
अलीने उज्माचे आरोप फेटाळून लावत संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला की, ती अद्यापही माझी पत्नी आहे. ना तिने तलाक मागितला ना मी तलाक दिला आहे.
 
उज्मा आणि अली यांची मलेशियात भेट झाली होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर ती वाघा बॉर्डरमार्गे एक मे रोजी पाकिस्तानात आली होती. खैबर पख्तुनख्वातील बुनेर भागात जाऊन तिने तीन मे रोजी अलीशी विवाह केला.
नंतर व्हिसाच्या निमित्ताने इस्लामाबादेत येऊन तिने भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेतला. अलीने बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने विवाह केला, असा आरोप करून जोपर्यंत भारतात परतण्याची मुभा मिळत नाही तोपर्यंत आपण येथून हलणार नसल्याचा पवित्रा तीने घेतला होता.