शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

..तर सेनेच्या बाहेरून पाठिंब्यानेही स्थिर सरकार उद्धव ठाकरेंना टोला : खडसे यांच्याकडून लगोलग समन्वयवादी भूमिका

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

नाशिक : राज्यात स्थिर सरकार हवे म्हणून भाजपाला पाठिंबा दिल्याचे सांगणार्‍या उद्धव ठाकरे यांना भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी नाशिकमध्ये टोला लगावला. सरकार स्थिर ठेवायचे एवढाच हेतु असेल तर बाहेरून पाठिंबा देऊनही ते साध्य करता येते, त्यासाठी सरकारमध्ये सामील होण्याची गरज काय असा प्रश्न खडसे यांनी केला आहे.

नाशिक : राज्यात स्थिर सरकार हवे म्हणून भाजपाला पाठिंबा दिल्याचे सांगणार्‍या उद्धव ठाकरे यांना भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी नाशिकमध्ये टोला लगावला. सरकार स्थिर ठेवायचे एवढाच हेतु असेल तर बाहेरून पाठिंबा देऊनही ते साध्य करता येते, त्यासाठी सरकारमध्ये सामील होण्याची गरज काय असा प्रश्न खडसे यांनी केला आहे.
राज्यात भाजपाबरोबर सत्तेत स्थापन होऊनही सेना सरकारवर टीका करीत आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेची पूर्ण सत्ता नाही. आम्ही केवळ सरकार स्थिर केले आहे, असे सांगतानाच त्यांनी मराठी माणसावर अन्याय केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला. खडसे यांचे नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी याबाबत विचारल्यानंतर खडसे यांनी शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी आहे. त्यांना केवळ सरकारच स्थिर करायचे असेल तर मंत्रिमंडळात सहभागी न होताही बाहेरून पाठिंबा देऊन सरकार स्थिर करता येते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात टक्केवारीच्या केलेल्या कथित विधानाचाही खडसे यांनी खिल्ली उडविली. कदम यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, असे सांगून कदम यांच्यामुळे मनोरंजन होत असल्याचे सांगितले. अर्थात, त्याचवेळी त्यांनी राज्यात सत्तेत असताना असे बोलणे योग्य नसल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री सध्या विदेश दौर्‍यावर गेले असून, ते परतल्यानंतर समन्वयाने तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नेण्याच्या विषयावरही त्यांनी या विषयाचे राजकारण केले जात असल्याचे नमूद केले. महाराष्ट्राच्या हक्काचे जे पाणी आहे ते मिळणारच आहे, परंतु समुद्रात वाहून जाणारे पाणी मात्र गुजरातला देण्याबाबत केंद्रशासनाचा प्रस्ताव आहे. केंद्रशासनाच्या नद्या जोड प्रकल्पाअंतर्गत त्यावर कार्यवाही सुरू आहे, असे सांगून खडसे म्हणाले की, महाराष्ट्रात असलेले पाणी १२०० मीटरवर उचलणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते. तथापि, हे पाणी महाराष्ट्रात उपलब्ध होऊ शकते ते दिले जाणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
जोड आहे.