शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

गोमांस नेत असल्याच्या संशयावरून दोन महिलांना जमावाकडून मारहाण

By admin | Updated: July 28, 2016 00:46 IST

गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना मंगळवारी रेल्वेस्टेशनवर मारहाण करण्यात आली. या महिलांकडे म्हशीचे मांस होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे

मंदसौर : गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना मंगळवारी रेल्वेस्टेशनवर मारहाण करण्यात आली. या महिलांकडे म्हशीचे मांस होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. स्वयंघोषित गोरक्षकांनी पोलिसांसमोर कायदा हातात घेतला तर जमलेल्या लोकांनी महिलांना वाचविण्याऐवजी घटनेचे चित्रीकरण सुरू केले.गुजरातमध्ये गायीचे कातडे कमावल्यावरून दलित कुटुंबावर हल्ल्याची धग शांत होते न होते तोच ही घटना घडली. विरोधी पक्ष यावरून पुन्हा रान उठवित असून संसदेतही बुधवारी याचे पडसाद उमटले. पोलीस अधिक्षक मनोज शर्मा यांनी सांगितले की, गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन महिलांना रेल्वेस्टेशनवर मारहाण सुरू असल्याची माहिती एकाने फोनवरून दिली. त्यानंतर मी पोलिसांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही महिलांना ठाण्यात आणले. त्यांच्याकडील मांसाची तपासणी करण्यात आली. तेव्हा ते गायीचे नाही तर म्हशीचे असल्याचे आढळले. महिलांवर पशू अत्याचार निवारण कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या दोघींपैकी एकीवर यापूर्वीही अवैधरीतीने मांस नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे शर्मा यांनी सांगितले. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा असून लोकांनी संयम बाळगायला हवा. कोणत्याची स्थितीत कायदा हातात घेऊ नये. आम्ही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असेही शर्मा म्हणाले. (वृत्तसंस्था)बसपा, काँग्रेसचा सरकारवर जोरदार हल्लाया मारहाणीवरून विरोधी पक्ष बसपा व काँग्रेसने बुधवारी राज्यसभेत गोंधळ घालत केंद्र सरकारवर हल्ला केला. गुजरातमधील घटनेनंतर विरोधकांनी केंद्रातील सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप केला होता. भाजपवर तुटून पडताना मायावती म्हणाल्या की, हे लोक एकीकडे मुलींचे रक्षण करण्याची आणि महिलांना मान-सन्मान देण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे त्यांच्यावर गुंड सोडतात. मायावती यांचे भाषण संपल्यानंतर बसपाचे सदस्य सभापतींसमोरील मोकळ्या जागेत उतरले आणि काँग्रेस सदस्यांच्या सोबतीने त्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. महिलाविरोधी सरकार, दलितविरोधी सरकार चालणार नाही, चालणार नाहीच्या घोषणा देत त्यांना सभागृह दणाणून सोडले. गोरक्षणाच्या नावावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी का निवेदन करीत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे सदस्य आनंद शर्मा यांनी केला. गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेस पक्ष तत्त्वत: गोरक्षणाच्या विरोधात नाही.तथापि, गोरक्षणाच्या नावाखाली दलित आणि मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आहेत. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार निंदनीय असल्याचे सांगितले. आम्ही महिलांविरुद्धचा हिंसाचार कधीही योग्य ठरवू शकत नाही. या प्रकरणाबाबत मध्यप्रदेश सरकारने कारवाई केली आहे, असेही ते म्हणाले.गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळलापोलिसांच्या समोर दुसऱ्या महिला प्रवाशांनी या महिलांना मारहाण केल्याचा आरोप मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी फेटाळून लावला. पोलिसांनी त्या महिलांना जमावाच्या तावडीतून वाचविले, असे ते म्हणाले. ‘त्या’ गायीला सिंहाने मारलेसुरत : गुजरातमध्ये मृत गायीचे कातडे कमावल्यावरून दलित कुटुंबाला स्वयंघोषित गोरक्षकांनी मारहाण केली होती. या कुटुंबाने कातडे कमावण्यासाठी गायीला ठार मारल्याचा दावा गोरक्षकांनी केला होता; मात्र त्यांचा हा दावा खोटा असल्याचे तपासात आढळून आले. या गायीला दलित कुटुंबाने नाही तर सिंहाने ठार केले होते, असे पोलिसांनी सांगितले.