शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

तब्बल दोन तृतीयांश भारतीयांना द्यावी लागते लाच

By admin | Updated: March 7, 2017 20:41 IST

गेल्या काही वर्षांमध्ये लाचखोरी ही भारतातील गंभीर समस्या बनली आहे.लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी असल्याचे

ऑनलाइन लोकमत
बर्लिन/नवी दिल्ली, दि. 7 - गेल्या काही वर्षांमध्ये लाचखोरी ही भारतातील गंभीर समस्या बनली आहे. साध्या सरकारी कचेरीपासून मोठमोठ्या सरकारी बाबूंपर्यंत अनेक ठिकाणी चहापानासाठी चिरीमिरी दिल्याविना काम होत नाही, याचा अनुभव सर्वसामान्यांना येत असतो. आता समोर आलेल्या एका सर्व्हेमधून आशिया पॅसिफिक देशांमध्ये लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतातील 69 टक्के नागरिकांना कधी ना कधी लाच द्यावी लागते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचारविरोधासाठी काम करणाऱ्या ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. सार्वजनिक सेवा सुविधा धेण्यासाठी तब्बल दोन तृतियांश  भारतीयांना लाच द्यावी लागते, असे या सर्व्हेत म्हटले आहे. भारतातील 69 टक्के नागरिकांनी आपल्याला कधी ना कधी लाच द्यावी लागल्याचे सांगितले. तर व्हिएतनाममधील 65 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे दहशतवादाने पोखरलेल्या पाकिस्तानमध्ये लाचखोरीचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे.  पाकिस्तानमधील 40 टक्के तर चीनमधील 26 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याची माहिती दिली. 
जपान आणि दक्षिण कोरियामध्ये लाचखोरीचे प्रमाण सर्वात कमी आहे. जपानमध्ये केवळ 0.2 टक्के लोकांनी आपणास लाचखोरीचा सामना करावा लागल्याचे सांगितले. तर दक्षिण कोरियामध्ये हा दर 3 टक्के एवढाच आहे. या सर्व्हेनुसार भारत लाचखोरीच्याबाबतीत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनंतर सातव्या स्थानी आहे.