शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
5
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
6
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
8
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
10
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
11
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
12
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
13
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
14
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
15
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
16
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
17
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
18
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
19
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
20
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 

तब्बल दोन तृतीयांश भारतीयांना द्यावी लागते लाच

By admin | Updated: March 7, 2017 20:41 IST

गेल्या काही वर्षांमध्ये लाचखोरी ही भारतातील गंभीर समस्या बनली आहे.लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी असल्याचे

ऑनलाइन लोकमत
बर्लिन/नवी दिल्ली, दि. 7 - गेल्या काही वर्षांमध्ये लाचखोरी ही भारतातील गंभीर समस्या बनली आहे. साध्या सरकारी कचेरीपासून मोठमोठ्या सरकारी बाबूंपर्यंत अनेक ठिकाणी चहापानासाठी चिरीमिरी दिल्याविना काम होत नाही, याचा अनुभव सर्वसामान्यांना येत असतो. आता समोर आलेल्या एका सर्व्हेमधून आशिया पॅसिफिक देशांमध्ये लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतातील 69 टक्के नागरिकांना कधी ना कधी लाच द्यावी लागते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचारविरोधासाठी काम करणाऱ्या ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. सार्वजनिक सेवा सुविधा धेण्यासाठी तब्बल दोन तृतियांश  भारतीयांना लाच द्यावी लागते, असे या सर्व्हेत म्हटले आहे. भारतातील 69 टक्के नागरिकांनी आपल्याला कधी ना कधी लाच द्यावी लागल्याचे सांगितले. तर व्हिएतनाममधील 65 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे दहशतवादाने पोखरलेल्या पाकिस्तानमध्ये लाचखोरीचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे.  पाकिस्तानमधील 40 टक्के तर चीनमधील 26 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याची माहिती दिली. 
जपान आणि दक्षिण कोरियामध्ये लाचखोरीचे प्रमाण सर्वात कमी आहे. जपानमध्ये केवळ 0.2 टक्के लोकांनी आपणास लाचखोरीचा सामना करावा लागल्याचे सांगितले. तर दक्षिण कोरियामध्ये हा दर 3 टक्के एवढाच आहे. या सर्व्हेनुसार भारत लाचखोरीच्याबाबतीत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनंतर सातव्या स्थानी आहे.