शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

उष्माघाताचे शहरात दोन बळी

By admin | Updated: May 21, 2016 00:06 IST

जळगाव: जिल्‘ात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री दोन जणांचा बळी घेतला आहे. मनोज रामचंद्र भादलीकर (वय ४० रा.शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) यांचा रात्री एक वाजता तर सुनील शालिग्राम वाणी (वय ४२ रा.रामेश्वर कॉलनी) यांचा गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मृत्यू झाला.

जळगाव: जिल्‘ात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री दोन जणांचा बळी घेतला आहे. मनोज रामचंद्र भादलीकर (वय ४० रा.शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) यांचा रात्री एक वाजता तर सुनील शालिग्राम वाणी (वय ४२ रा.रामेश्वर कॉलनी) यांचा गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मृत्यू झाला.
भादलीकर हे नवभारत या वृत्तपत्रात मार्केटिंग विभागात कामाला होते. गुरुवारी दिवसभर ड्युटी केल्यानंतर संध्याकाळी ते घरी गेले. रात्री साडे बारा वाजता त्यांना अचानक रक्तदाब कमी होऊन मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला. यावेळी खासगी डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले होते. त्यांनी प्राथमिक उपचार केले, मात्र शरीरातील पाणी कमी झाल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दिवसा उन्हाचा फटका बसल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
भादलीकर हे अजातशत्रू व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मित्र परिवाराने त्यांचे घर गाठून परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या प›ात पत्नी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांची परिस्थितीत साधारणच होती. ते घरातील एकमेव कर्ते व्यक्ती होते.
वाणींचा मृतदेहच आढळला
सुनील वाणी यांचा मृतदेह गुरुवारी संध्याकाळी काशिनाथ लॉज परिसरात आढळून आला होता.त्यांना दारुचेही व्यसन होते. उन्हाचा फटका बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वाणी हे अविवाहित होते. भाऊ भास्कर वाणी यांच्यात ते राहत होते.दरम्यान, दोघांवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.