शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

पुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

By admin | Updated: March 9, 2016 19:50 IST

अवंतिपोरा येथील वांडाखपोरा गावात झालेल्या चकमकीत लष्करी जवानांनी बुधवारी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. ९ - दक्षिणकाश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरा येथील वांडाखपोरा गावात झालेल्या चकमकीत लष्करी जवानांनी बुधवारी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. मागच्यावर्षी उधमपूर येथे बीएसएफच्या ताफ्यावर हल्ल्याच्या कट रचणारा मुख्य सूत्रधार या चकमकीत ठार झाला आहे. 
लष्कर-ए-तोएबचा कमांडर आणि उधमपूर हल्ल्याचा सूत्रधार अबू उकाशा आणि एक दहशतवादी या चकमकीत ठार झाला. पूचाल भागात शोधमोहिम सुरु असताना गोरीपोरा गावातून  गोळीबाराचा आवाज आला अशी माहिती पोलिस अधिका-याने दिली. 
अतिरिक्त कुमक तात्काळ गोरीपोरा गावात दाखल झाली आणि अतिरेक्यांना पळता येऊ नये यासाठी गावाला वेढा घातला. अतिरेक्यांनी तिथून निसटण्यासाठी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. अजूनही काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता असून, अजूनही चकमक सुरु आहे.