शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित
शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच प्रलंबित : अद्यापपर्यंत फक्त ७० हजार अर्ज निकाली
नागपूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले, मात्र ते समाजकल्याण विभागाला अद्यापही मिळाले नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयात प्रलंबित असल्यामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात महाविद्यालय पातळीवर प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या २,२३,९६४ आहे.
शैक्षणिक सत्र २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अद्यापपर्यंत ३,३४,३४४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दस्तऐवज महाविद्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जमा केले आहे. शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी हे दस्तऐवज समाजकल्याण विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. समाजकल्याण विभाग कागदपत्रांची स्क्रूटीनी करून शिष्यवृत्ती मंजूर करते. मात्र अनेक महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविलेच नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या २,२३,९६४ आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयांनी विभागाला अर्ज उपलब्ध करून न दिल्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या सत्रात विभागाकडे अद्यापपर्यंत ७०,५७१ अर्ज प्राप्त झाले. यातील ६९,१४४ अर्ज विभागाने मंजूर केले, तर १४२७ अर्जांमध्ये त्रुटी असल्याने नाकारण्यात आले.
चौकट
विभागनिहाय अर्जाची सद्यस्थिती
जिल्हानोंदणीकृत अर्जमहाविद्यालय पातळीवर प्रलंबित अर्ज
वर्धा४२५७८२७३२३
नागपूर १५४७४५ १०८७०९
भंडारा ३५३०३१७४३२
गोंदिया२९६०३२९२०२
गडचिरोली१७४०५९२५७
चंद्रपूर५४७१०३२०३६

::::चौकट:::
महाविद्यालयांबरोबर विद्यार्थ्यांकडूनही निष्काळजीपणा
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याबरोबर आवश्यक कागदपत्रांचे दस्तऐवज महाविद्यालयात जमा करावे लागतात. विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज भरतात, मात्र कागदपत्रे महाविद्यालयात जमा करीत नाही. तर महाविद्यालयही विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांच्या मागणीसाठी तगादा लावत नाही. सरकारी महाविद्यालयाकडून शिष्यवृत्तीची प्रक्रिया राबविण्याबद्दल अतिशय निष्काळजी केली जाते. त्यामुळे महाविद्यालय पातळीवर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहतात.
::::चौकट:::
समाजकल्याण विभागाचा महाविद्यालयांना इशारा
वेळेवर अर्ज आल्यास त्याची स्क्रूटीनी करणे कठीण जाईल व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळू शकणार नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज कार्यालयाला वेळेच्या आत मिळावे म्हणून विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या बैठका घेण्यात येत आहे. बैठकांमध्ये महाविद्यालयाला कारवाईचा इशाराही देण्यात येत आहे. असे असतानाही महाविद्यालयाकडून गांभीर्याने घेतले जात नाही. शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. महाविद्यालय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी म्हणून महाविद्यालयांना निर्देश देणे गरजेचे आहे, अन्यथा लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील.
आर.डी. आत्राम, विभागीय समाजकल्याण अधिकारी