शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित
शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच प्रलंबित : अद्यापपर्यंत फक्त ७० हजार अर्ज निकाली
नागपूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले, मात्र ते समाजकल्याण विभागाला अद्यापही मिळाले नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयात प्रलंबित असल्यामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात महाविद्यालय पातळीवर प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या २,२३,९६४ आहे.
शैक्षणिक सत्र २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अद्यापपर्यंत ३,३४,३४४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दस्तऐवज महाविद्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जमा केले आहे. शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी हे दस्तऐवज समाजकल्याण विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. समाजकल्याण विभाग कागदपत्रांची स्क्रूटीनी करून शिष्यवृत्ती मंजूर करते. मात्र अनेक महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविलेच नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या २,२३,९६४ आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयांनी विभागाला अर्ज उपलब्ध करून न दिल्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या सत्रात विभागाकडे अद्यापपर्यंत ७०,५७१ अर्ज प्राप्त झाले. यातील ६९,१४४ अर्ज विभागाने मंजूर केले, तर १४२७ अर्जांमध्ये त्रुटी असल्याने नाकारण्यात आले.
चौकट
विभागनिहाय अर्जाची सद्यस्थिती
जिल्हानोंदणीकृत अर्जमहाविद्यालय पातळीवर प्रलंबित अर्ज
वर्धा४२५७८२७३२३
नागपूर १५४७४५ १०८७०९
भंडारा ३५३०३१७४३२
गोंदिया२९६०३२९२०२
गडचिरोली१७४०५९२५७
चंद्रपूर५४७१०३२०३६

::::चौकट:::
महाविद्यालयांबरोबर विद्यार्थ्यांकडूनही निष्काळजीपणा
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याबरोबर आवश्यक कागदपत्रांचे दस्तऐवज महाविद्यालयात जमा करावे लागतात. विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज भरतात, मात्र कागदपत्रे महाविद्यालयात जमा करीत नाही. तर महाविद्यालयही विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांच्या मागणीसाठी तगादा लावत नाही. सरकारी महाविद्यालयाकडून शिष्यवृत्तीची प्रक्रिया राबविण्याबद्दल अतिशय निष्काळजी केली जाते. त्यामुळे महाविद्यालय पातळीवर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहतात.
::::चौकट:::
समाजकल्याण विभागाचा महाविद्यालयांना इशारा
वेळेवर अर्ज आल्यास त्याची स्क्रूटीनी करणे कठीण जाईल व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळू शकणार नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज कार्यालयाला वेळेच्या आत मिळावे म्हणून विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या बैठका घेण्यात येत आहे. बैठकांमध्ये महाविद्यालयाला कारवाईचा इशाराही देण्यात येत आहे. असे असतानाही महाविद्यालयाकडून गांभीर्याने घेतले जात नाही. शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. महाविद्यालय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी म्हणून महाविद्यालयांना निर्देश देणे गरजेचे आहे, अन्यथा लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील.
आर.डी. आत्राम, विभागीय समाजकल्याण अधिकारी