शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित

दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात वंचित
शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच प्रलंबित : अद्यापपर्यंत फक्त ७० हजार अर्ज निकाली
नागपूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले, मात्र ते समाजकल्याण विभागाला अद्यापही मिळाले नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयात प्रलंबित असल्यामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात महाविद्यालय पातळीवर प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या २,२३,९६४ आहे.
शैक्षणिक सत्र २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अद्यापपर्यंत ३,३४,३४४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दस्तऐवज महाविद्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जमा केले आहे. शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी हे दस्तऐवज समाजकल्याण विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. समाजकल्याण विभाग कागदपत्रांची स्क्रूटीनी करून शिष्यवृत्ती मंजूर करते. मात्र अनेक महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविलेच नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या २,२३,९६४ आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयांनी विभागाला अर्ज उपलब्ध करून न दिल्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या सत्रात विभागाकडे अद्यापपर्यंत ७०,५७१ अर्ज प्राप्त झाले. यातील ६९,१४४ अर्ज विभागाने मंजूर केले, तर १४२७ अर्जांमध्ये त्रुटी असल्याने नाकारण्यात आले.
चौकट
विभागनिहाय अर्जाची सद्यस्थिती
जिल्हानोंदणीकृत अर्जमहाविद्यालय पातळीवर प्रलंबित अर्ज
वर्धा४२५७८२७३२३
नागपूर १५४७४५ १०८७०९
भंडारा ३५३०३१७४३२
गोंदिया२९६०३२९२०२
गडचिरोली१७४०५९२५७
चंद्रपूर५४७१०३२०३६

::::चौकट:::
महाविद्यालयांबरोबर विद्यार्थ्यांकडूनही निष्काळजीपणा
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याबरोबर आवश्यक कागदपत्रांचे दस्तऐवज महाविद्यालयात जमा करावे लागतात. विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज भरतात, मात्र कागदपत्रे महाविद्यालयात जमा करीत नाही. तर महाविद्यालयही विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांच्या मागणीसाठी तगादा लावत नाही. सरकारी महाविद्यालयाकडून शिष्यवृत्तीची प्रक्रिया राबविण्याबद्दल अतिशय निष्काळजी केली जाते. त्यामुळे महाविद्यालय पातळीवर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहतात.
::::चौकट:::
समाजकल्याण विभागाचा महाविद्यालयांना इशारा
वेळेवर अर्ज आल्यास त्याची स्क्रूटीनी करणे कठीण जाईल व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळू शकणार नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज कार्यालयाला वेळेच्या आत मिळावे म्हणून विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या बैठका घेण्यात येत आहे. बैठकांमध्ये महाविद्यालयाला कारवाईचा इशाराही देण्यात येत आहे. असे असतानाही महाविद्यालयाकडून गांभीर्याने घेतले जात नाही. शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. महाविद्यालय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी म्हणून महाविद्यालयांना निर्देश देणे गरजेचे आहे, अन्यथा लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील.
आर.डी. आत्राम, विभागीय समाजकल्याण अधिकारी