शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

काश्मीरमध्ये लष्करचे दोन अतिरेकी ठार, एकास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:50 IST

दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तैयबा’चे दोन अतिरेकी

श्रीनगर : दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तैयबा’चे दोन अतिरेकी ठार झाले तर तिसऱ्या अतिरेक्याने शस्त्र व दारुगोळ््यासह शरणागती पत्करली. सुरक्षा दलांच्या या कारर्वासविरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनेरस्त्यांवर येऊन दगडफेक सुरु केली. या हिंसक जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैमोह तालुक्यातील चिद्दर गावातील एका घरात अतिरेकी लपून बसले आहेत अशी पक्की खबर मिळाल्याने लष्कराचे जवान व पोलिसांनी त्या इमारतीस वेठा घातला. लपलेल्या अतिरेक्यांनी शरण येण्याऐवजी गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलांनीही गोळीबाराने जोरदार प्रत्युत्तर दिले.सुमारे दोन तास चाललेल्या या कारवाईत इमारतीत लपलेले दोन अतिरेकी ठार झाले. त्यापैकी एक शकूर अहमद दर हा लष्कर-ए-तैयबाचा स्थानिक कमांडर होता.शाकीर अहमाद नावाच्या तिसºया अतिरेक्याने पळून जाणे अशक्य झाल्यावर शरणागती पत्करली. स्थानिक काश्मिरी युवक असलेला शाकीर दोनच महिन्यांपूर्वीअतिरेक्यांना जाऊन मिळाला होता, असे समजते.सुरक्षा दलांची ही कारवाई सुरु असताना स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर येऊन दगडफेक सुरु केली. त्या जमावास आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर, पेलेट गन व नंतर बंदुकांचा वापर केला.पोलिसांच्या गोळीबारात निदर्शकांपैकी यावर अहमद दर हा गस्सीपुरा येथील युवक गंभीर जखमी झाला. नंतर अनंतनाग येथील इस्पितळात त्याचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)मेहबूबा यांनी टष्ट्वीटरवर लिहिले की, आघाडी सरकारचा अ‍ॅजेंडा राम माधव यांनीच तयार केला होता व राजनाथ सिंग यांच्यासह भाजपाच्या नेतृत्वाने त्यास मान्यता दिली होती. आम्ही त्या अ‍ॅजेंड्याचे पालन केले. सत्तेत असताना भाजपाच्या एकाही मंत्र्याने त्याविषयी तक्रार केली नाही. मात्र आता त्या पक्षाने हात वर करून आमच्यावर खापर फोडावे हा तद्दन खोटेपणा आहे. आमच्यावर आरोप करण्याऐवजी भाजपाच्या मंत्र्यांनी आधी आपण स्वत: काय काम केले हे तपासून पाहायला हवे होते.